Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

smart phone
Webdunia
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (09:11 IST)
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ते सप्टेंबर २०१८ या तिमाहीमध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकल्याचा अहवाल कॅनालिस या संस्थेने दिला आहे. या तिमाहीमध्ये भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या ४.०४ कोटी इतकी होती. तर पहिल्या स्थानावर १०.०६ कोटींच्या स्मार्टफोनसह चीन पहिल्या स्थानावर आहे. याच कालावधीत अमेरिकी बाजारपेठेत दाखल झालेल्या स्मार्टफोन्सची संख्या ४ कोटी होती, त्यामुळे या कालावधीत झालेल्या स्मार्टफोन्सच्या विक्रीच्या बाबतीत भारताने अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मात्र, स्मार्टफोन्सच्या खरेदीच्या बाबतीत चिनी बाजारपेठ भारतापेक्षा प्रचंड पुढे असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
 
जुलै ते सप्टेंबर २०१८ या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत स्मार्टफोन्सची विक्री ७.२ टक्क्यांनी घटून ३४.८९ कोटी इतकी झाली आहे. गेले चार महिने स्मार्टफोन्सच्या विक्रीत सातत्यानं घट होत आहे, असे कॅनालिसनं आपल्या अहवालात नमूद केले आहे.
 
ज्या तीन देशांमध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाली आहे त्यामध्ये इंडोनेशिया (१३.२ टक्के वाढीसह ८९ लाख), रशिया (११.५ टक्के वाढीसह ८८ लाख) व जर्मनी (२.४ टक्के वाढीसह ५५ लाख) यांचा समावेश आहे. पहिल्या स्थानी असलेल्या चिनी बाजारपेठेतील मागणीही गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत १५.२ टक्क्यांनी घटली तर भारतातली मागणी १.१ टक्क्यानं घटली आहे.
 
स्मार्टफोन उत्पादकांमध्ये सॅमसंग २०.४ टक्के बाजारातील हिश्शासह आघाडीवर आहे. त्यामागोमाग हुआवेई (१४.९ टक्के), अपल (१३.४ टक्के), शाओमी (९.६ टक्के) व ओप्पो (८.९ टक्के) या कंपन्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: राधाकृष्णन यांनी राहुल पांडेंसह तीन जणांना मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ दिली

राहुल गांधी भारतीय आहे की नाही? उच्च न्यायालयाने मोदी सरकारकडून मागितले उत्तर, दिला दहा दिवसांचा वेळ

राज ठाकरे मनसे कार्यकर्त्यांवर भडकले, म्हणाले २९ तारखेपर्यंत गप्प राहा

कोल्हापूर : प्रसिद्ध उद्योगपतीच्या मुलाचा अपघातात मृत्यू

नर्मदापुरममध्ये आई आणि मुलीचे मृतदेह आढळले, धारदार शस्त्राने हत्या

पुढील लेख
Show comments