Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मृत बाळ पुन्हा झाले जिवंत,सुखरूप घरी आले

Webdunia
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (16:35 IST)
दैव तारी त्याला कोण मारी. काळ आला होता पण वेळ आली नव्हती.  असं घडलं आहे लंडन येथे .चमत्कार आजदेखील होतात ह्याचा प्रत्यय आला आहे लंडन मध्ये. एका प्री-मॅच्युर बाळाचा जन्म झाला आणि त्याच्या हृदयाचे ठोके 17 मिनिटासाठी बंद पडले. डॉक्टरांनी नियतीच्या पुढे हात टेकले ते निराश झाले. बाळाच्या कुटुंबीयांनी टाहो फोडला. परंतु खरा चमत्कार येथे झाला. ते बाळ आता सुखरूप बरा होऊन त्याचा घरी परतला आहे.  
 
बाळाची आई बेथानी होमरने एका वृत्तपत्राला सांगितले की, ती 26 आठवडे आणि तीन दिवसांची गरोदर राहिल्यानंतर तात्काळ सिझेरियनसाठी नेण्यात आले तेव्हा तिच्या बाळाच्या जगण्याची शक्यता जास्त नव्हती. अशा परिस्थितीत तिला प्लेसेन्टल ऍबॉर्शनला सामोरी जावे लागले. अशा परिस्थितीत बाळाच्या जन्मापूर्वी प्लॅसेंटा गर्भाशयापासून वेगळे केले जाते. हे बाळाच्या जीवनासाठी धोकादायक असत.  
 
बाळाच्या आईने सांगितले की, जन्माच्या वेळी बाळाचे वजन फक्त 750 ग्राम होते आणि त्याच्या हृदयाचे ठोके 17 मिनिटे बंद पडले. त्यानंतर बाळाचा श्वासोच्छ्वास सुरु झाला. त्याला जिवंत ठेवण्यासाठी रक्त देण्यात आले. स्कॅन केल्यावर बाळाच्या मेंदूत काहीही त्रुटी आढळली नाही. बाळाला रुग्णालयात देखरेख खाली ठेवण्यात आले. तब्बल 112 दिवसांनंतर बाळाला सुखरूप घरी आणले. बाळाला अद्याप ऑक्सिजन पुरवठा द्यावा लागत आहे. डॉक्टरांनी म्हटले की.बाळाला जीवनदान देण्यात यश मिळाले. ते 17 मिनिटे महत्त्वाची असल्याचे डॉक्टरांनी सांगितले अन्यथा अघटित घडू शकले असते. बाळाच्या हृदयाला एक छिद्र असून एक व्हॉल्व्ह उघडे आहे. त्यामुळे बाळाची काळजी घ्यावी लागेल. 
 
बाळाच्या आईला बाळाच्या जन्माच्या वेळी सांगितले की. प्रसूतीच्या वेळी परिस्थिती नाजूक असल्यामुळे बाळाचा मृत्यू पोटातही होऊ शकतो किंवा बाळा जन्मतः दगावू शकतो अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. आईची प्रसूती अचानक करावी लागल्यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके बंद पडले आणि नंतर 17 मिनिटानंतर पुन्हा बाळ जिवंत होणे हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. 

Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

मुंबई लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

LPG स‍िलेंडरचा सर्वसामान्यांनावर फटका

सावधान! राज्यात उष्णतेचा पारा वाढणार

LIVE: औरंगजेबाची कबर असलेल्या खुलदाबादचे नाव बदलण्याची मागणी तीव्र

मुंबई: हाय स्पीड टेम्पोने सिग्नल तोडला, वृद्ध महिलेचा मृत्यू

पुढील लेख
Show comments