Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंजाबपुढे आज ‘करो या मरो’ची स्थिती

वेबदुनिया
WD
सोमवार 6 मे रोजी येथे यजमान किंग्ज इलेव्हन पंजाब आणि प्रबळ असा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघात सहाव्या आयपीएल स्पर्धेतील ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.

हा सामना म्हणजे पंजाबसाठी ‘करो या मरो’ अशा स्थितीचा राहील. पंजाबने 10 सामन्यात 4 विजांसह 8 गुण मिळविले आहेत व हा संघ आयपीएल साखळी गुणतक्त्यात सहाव्या स्थानी आहे. पहिल्या चार संघात म्हणजेच प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी पंजाबला सहापैकी चार सामने जिंकण्याची गरज आहे. या सामन्यात पराभव झाला तर मात्र पंजाब संघाची या स्पर्धेतील मोहीम संपुष्टात आल्यासारखे होईल.

बंगळुरू संघात ख्रिस गेल, कर्णधार विराट कोहली असे तडफदार फलंदाज आहेत. या दोघांशिवाय एबी डी’व्हिलिअर्स, सौरभ तिवारी यासारखे फलंदाज आहेत. पंजाबचा कर्णधार अँमम गिलख्रिस्ट याला वारंवार संघाबाहेर बसावे लागत आहे. बंगळुरू संघाने 11 पैकी 7 विजय मिळविले आहेत. त्यामुळे त्यांची स्थिती भक्कम अशी झालेली आहे. पुणे वॉरिअर्सविरुद्ध 23 एप्रिल रोजी बंगळुरू येथे रॉयल संघाने 263 धावा केल होत व ख्रिस गेलने 66 चेंडूंवर 175 धावा झोडपल्या होत्या. त्यामुळे गेलचेसुद्धा पंजाबपुढे आव्हान असणार आहे. पुण्याला पराभूत केल्यानंतर बंगळुरूने लागोपाठ दोन पराभव पत्करले होते. पंजाबनेसुद्धा चेन्नईकडून 15 धावांनी पराभव पत्करला होता. त्यामुळे या दोन संघात अटीतटीची व प्रेक्षणीय झुंज अपेक्षित आहे. पंजाबचा कर्णधार डेव्हिड हसी यानेही चेन्नई फलंदाजांचे कौतुक केले आहे.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments