rashifal-2026

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोबाईल निर्मिती केंद्र

Webdunia
सोमवार, 1 जून 2020 (22:14 IST)
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचं मोबाईल निर्मिती केंद्र ठरत असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. गेल्या पाच वर्षात, देशात २०० पेक्षा अधिक मोबाईल निर्मिती युनिट्स सुरु करण्यात आले आहेत. यासंदर्भात माहिती देणारं एक ग्राफिकल प्रेझेंटेशन सोशल मीडियाद्वारे त्यांनी  शेअर केलं आहे.
 
यानुसार, भारतात सन २०१४ च्या तुलनेत मोबाईल हँडसेट निर्मिती करणाऱ्या युनिट्समध्ये सन २०१९ मध्ये २०० टक्के वाढ झाली. यातील आलेखानुसार, २०१९-२० या आर्थिक वर्षात ३३० मिलियन (३ कोटी ३० लाख) मोबाईल फोन्सची निर्मिती करण्यात आली. या मोबाईल हँडसेट्सची एकूण किंमत सुमारे ३० मिलियन डॉलर इतकी आहे.
 
दरम्यान, प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी शाओमी इंडियाचे प्रमुख मनू कुमार जैन यांनी नुकतचं ट्विट करुन सांगितलं की, त्यांच्या कंपनीचे Mi आणि Redmi या ब्रँडचे ९९ टक्के स्मार्टफोन्स भारतातच तयार केले जात आहेत. याचे ६५ टक्के पार्ट्स देखील भारतातच तयार केले जात आहेत. अॅपलने यापूर्वीच Wistron and Foxconn या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर्सच्या सहकार्याने iPhone ची काही मॉडेल्स भारतातच तयार करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नागपूरमध्ये एका उघड्या नाल्यात एका 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाले, ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर गुन्हे शाखेने पॉश परिसरातील 4 क्रिकेट बुकींना अटक केली

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments