Marathi Biodata Maker

रिलायन्स कम्युनिकेशन ची २जी मोबाईल सेवा बंद

Webdunia
गुरूवार, 26 ऑक्टोबर 2017 (11:26 IST)

रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी कर्जात बुडाल्यामुळे महिन्याभरात या २जी मोबाईल सेवा बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. मात्र कंपनीची ३जी आणि ४जी सुविधा चालू राहणार आहे. औद्योगिक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. कंपनीचे कार्यकारी निर्देशक गुरदीप सिंह यांनी याबद्दलच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ३० दिवसात वायरलेस व्यवसाय बंद करण्यात येणार आहे. 

त्यांनी सांगितले की, आयएलडी वॉयस, कंज्यूमर वॉयस, 4G पोस्टपेड डोंगल आणि मोबाईल टॉवर या सुविधा नफा होईपर्यंत चालू ठेवण्याचा कंपनीचा मानस आहे. याव्यतिरिक्त सर्व व्यवसाय बंद करण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंह यांनी सांगितले की, २१ नोव्हेंबरला लायसन्स संपल्यानंतर डीटीएच सेवा देखील बंद केल्या जातील. 

या कंपनीवर ४६ हजार करोडचे कर्ज आहे. या महिन्याच्या सुरुवातीला एयरसेलला व्हायरलेस कारभार विकण्याच्या त्यांचा करार देखील असफल ठरला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

नवरदेवाने परतफेड भेट म्हणून संपूर्ण गावातील लोकांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले

ठाणे विधान परिषद निवडणूक: शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचे नाव निश्चित; क्षितीज ठाकूरांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम

महाराष्ट्रातील आणखी एका रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार, मंत्रिमंडळाची मंजुरी

कांदा प्रश्न चिघळला: चांदवडमधील महामोर्च्यात आक्रमक निदर्शने; आमदार रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात

LIVE: नाशिकमध्ये रोहित पवार आणि अनेक प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अटक केली

पुढील लेख
Show comments