Festival Posters

स्मार्टफोनची उतरणारी बॅटरी देते मुलाखतीपेक्षाही जास्त तणाव

Webdunia
मंगळवार, 3 एप्रिल 2018 (12:34 IST)
स्मार्टफोन सध्या आपल्या आयुष्यात असा काही एकरुप झाला आहे की, त्याच्यापासूनचा दुरावा सोडाच, त्याची बॅटरी उतरली तरी अनेकांना चांगला तणाव येतो. स्मार्टफोनची बॅटरी संपत असल्याचे पाहून काही जणांची मुलाखतीला जाताना वा एखाद्या महत्त्वाच्या बैठकीला विलंब झाल्यास जेवढा तणाव येतो, तशी अवस्था होते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. चीनमधील हुआवेई कंपनीच्या शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यात त्यांना असे दिसून आले की, लोक आपल्या र्स्माफोनची बॅटरी कमी होत असल्याचे पाहून अतिशय कासावीस होतात. प्रवासादरम्यान कारमध्ये बिघाड होणे वा घरी वीजपुरवठा खंडित झाला असेल तेव्हासुद्धा ही परिस्थिती जास्त खराब होते. मुलाखतीसाठी जातेवेळी व तातडीच्या बैठकीला उशीर होत असल्यास जेवढा तणाव येणार नाही, तेवढा फोनची बॅटरी संपल्यावर होतो. कंपनीने या अध्ययनासाठी ब्रिटनमधील दोन हजारांपेक्षा जास्त प्रौढ व्यक्तीसोबत बातचित केली. अध्ययनाचे प्रुख डॉ. लिंडा पापाडोपोलस यांनी सांगितले की, स्मार्टफोन आता आपल्या आयुष्याचे अविभाज्य अंग बनला आहे. लोक त्याला आपल्या संपर्काचे अत्यावश्यक साधन म्हणून पाहत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

हार्दिक पंड्याने मुलगा अगस्त्यला ४ कोटी रुपयांची आलिशान कार भेट दिली, माजी पत्नी नताशा स्टॅनकोविचने ती स्वीकारली

LIVE: महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू

सोलापूर : प्रेमविवाहानंतर एक वर्षात तरुणाने आत्महत्या केली; आपल्या मुलीसाठी भावनिक संदेश सोडला

आम्ही मराठी माणसांची ताकद दाखवू; रोहित पवार का संतापले?

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरू, महायुती सरकारचे कौतुक

पुढील लेख
Show comments