Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समस्या दूर झाली, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पूर्वीप्रमाणे काम करू लागले

समस्या दूर झाली  व्हॉट्सअॅप  फेसबुक आणि इन्स्टाग्राम पूर्वीप्रमाणे काम करू लागले
Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (09:41 IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने सोमवारी रात्री जगभरात अचानक काम करणे बंद केले. ही समस्या सोमवारी रात्री 9 च्या सुमारास समोर आली. आता हे सर्व मेसेजिंग अॅप्स पुन्हा काम करू लागले आहेत, परंतु ते काम न करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
 
आउटेज दरम्यान, लोक संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकले नाहीत. आऊटेज ट्रॅकिंग कंपनी DownDetector.com च्या मते, 80,000 पेक्षा जास्त वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपवर आणि 50,000 पेक्षा जास्त फेसबुकवर तक्रारी दाखल केल्या. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्ते न्यूज फीड अपडेट करू शकले नाहीत, तर व्हॉट्सअॅप वापरकर्ते कोणतेही संदेश पाठवू शकले नाहीत. व्हॉट्सअॅप वर 5xx आणि फेसबुक मध्ये डोमेन नेम सिस्टीम एरर दाखवत होता.
 
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम या तिन्हीचे मालक फेसबुक आहे. सेवा बंद झाल्यानंतर फेसबुकने म्हटले आहे की काही लोकांना अॅप वापरण्यास त्रास होत आहे. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच ही समस्या दूर होईल. त्याचवेळी, सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्हाला माहित आहे की यावेळी काही लोकांना अडचणी येत आहेत. आम्ही गोष्टी पुन्हा सामान्य करण्यासाठी काम करत आहोत आणि आपल्याला शक्य तितक्या लवकर कळवू. आपल्या संयमाबद्दल आभार मानतो.
विशेष म्हणजे भारतात व्हॉट्सअॅपचे 53 कोटी, फेसबुकचे 41 कोटी आणि इंस्टाग्रामचे 21 कोटी वापरकर्ते आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत ६० जणांना अटक, वकिलांनी सांगितले निर्दोषांना शिक्षा होऊ नये

LIVE: औरंगजेब कबर वादाबद्दल मंत्री शंभूराजे देसाई यांनी मोठे विधान केले

औरंगजेब वादावर आंबेकरांनी केलेल्या विधानाला शिवसेना यूबीटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला

'एखाद्याचे घर पाडणे योग्य नाही...', सरकारच्या बुलडोझर कारवाईवर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांची प्रतिक्रिया

आरएसएसने नागपूर हिंसाचाराला चुकीचे म्हटले, आंबेकर म्हणाले- अशा घटना समाजासाठी चांगल्या नाहीत

पुढील लेख
Show comments