Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाइल पाण्यात पडल्यावर काय करावे?

Webdunia
पावसाळा आला की पावसात जाणार्‍या प्रत्येक व्यक्तिला आपला मोबाईल भिजण्याची फार भीती असते. कारण मोबाइल पाण्यात भिजल्यास तो लगेच खराब होतो. त्यामुळे बरेचजण पावसाळ्यात बाहेर जाणेही टाळतात. मात्र, तरीही तुमचा फोन चुकून भिजलाच तर काळजी करू नका. कारण आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमचा मोबाइल खराब होण्यापासून वाचू शकतो. 
 
फोन पाण्यात भिजल्यावर सर्वात अगोदर फोन बंद करा, जर फोन चालू असेल तर आत पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते.
 
भिजलेला फोन आधी बंद करुन सर्व पार्ट्‌स वेगवेगळे करा. जसे की बॅटरी, सिमकार्ड, मेमरी कार्ड बाजूला काढून कोरड्या कापडावर ठेवा.
 
फोनचे सर्व पार्टस्‌ वेगवेगळे केल्यानंतर त्यांना वाळवणे गरजेचे आहे. त्यासाठी पेपर नॅपकिनचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरेल.
 
जर तुमच्या फोनची बॅटरी इनबिल्ट असेल तर बॅटरी काढण्याचा प्रश्नच येत नाही, त्यावेळी तुम्ही फक्त जोपर्यंत मोबाइल स्वीचऑफ होत नाही तोपर्यंत पॉवर बटन दाबून ठेवा.
 
एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्याठिकाणी इतर पार्ट्‌स आणि मोबाइल तांदळाच्या प्लेटध्ये ठेऊन वाळू द्या. तांदूळ मोबाइलमधून पाणी शोषून घेते.

या काही टिप्स वापरुन तुम्ही भिजलेला फोन वाचवू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

सर्व पहा

नवीन

LIVE: शिवसेना युबीटी सोबत मनसे नेतेही शिंदे गटात सामील झाले

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू

शिवसेना युबीटीसोबत मनसेला देखील मोठा धक्का, राजन साळवींसह या नेत्यांनी पक्ष बदलला

'विरोधी पक्षाचा सरपंच असलेल्या गावाला एक रुपयाही मिळणार नाही', मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान

ऑटोरिक्षा आणि एसयूव्हीची समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत २ जणांचा जागीच मृत्यू तर ५ जण जखमी

पुढील लेख
Show comments