Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्हाट्सएप वापरकर्ते आता एका वेळी 5 लोकांनाच चॅट फॉरवर्ड करू शकतात

Webdunia
गुरूवार, 24 जानेवारी 2019 (11:50 IST)
व्हाट्सएपने आता जागतिक पातळीवर फॉरवर्ड केले जाणार्‍या संदेशांना 1 वेळी 5 चॅटपर्यंत सीमित केले आहे. कंपनीने  भारतात गेल्या वर्षी जुलैमध्येच ते लागू केले आहे. व्हाट्सएपने या प्लॅटफॉर्मवर अफवा आणि खोट्या बातम्या टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. व्हाट्सएपने आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की हे कंपनीला वैयक्तिक संदेशांवर लक्ष देण्यास मदत मिळेल. 
 
कंपनीच्या मते आम्ही फारच सावधगिरी बाळगून ही तपासणीचे केली आणि सुमारे 6 महिन्यापर्यंत वापरकर्त्यांकडून मिळालेल्या प्रतिसादांवर लक्ष केंद्रित केले. संदेश फॉरवर्ड करण्याची मर्यादा सेट केल्याने जगभरात संदेश फॉरवर्ड करण्यावर नियंत्रण होईल. व्हाट्सएपनुसार संदेश आणि चॅट इत्यादींना फक्त पाच लोकांना फॉरवर्ड करता येईल. 
 
व्हाट्सएप इंडिया, ब्राझील आणि इंडोनेशियाला त्यांचा मुख्य बाजार मानतो. कंपनीच्या मते तो वापरकर्त्यांच्या प्रतिसादांवर सतत लक्ष देईल आणि कालांतराने व्हायरल सामग्रीच्या समस्येशी तडजोड करण्यासाठी नवीन पद्धतीचे वापर करेल. व्हाट्सएपनुसार त्याच्या तपासणी दरम्यान व्हाट्सएपवर शेअर केलेल्या संदेशांची संख्या 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. व्हाट्सएपमते जवळच्या मित्रांना संदेश देणे आणि कोणत्याही प्रकारचा गैरवापर टाळण्यासाठी हे पुरेसे आहे. कंपनीने अशा वेळी हे पाऊल उचलले आहे जेव्हा जगभरातील सरकार आणि नियामक डिजीटल मंच खोट्या संदेशांचा प्रसार थांबविण्यासाठी प्रभावी मार्ग शोधत आहे. 
 
महत्त्वाचे म्हणजे व्हाट्सएप पासून प्रसारित अफवांमुळे भारतात हिंसाच्या घटना घडत होत्या. त्यात बर्‍याच लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. यानंतर भारतात व्हाट्सएपला सरकारकडून तीव्र टीकेचा सामना देखील करावा लागला.  सरकारी दबावानंतर कंपनीने फॉरवर्ड केल्या जाणार्‍या संदेशांची सीमा 1 वेळी फक्त 5 लोकांना संदेश पाठवू शकता अशी केली. तसेच, जलद फॉरवर्ड बटण देखील काढून टाकण्यात आले. 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments