Marathi Biodata Maker

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

Webdunia
गुरूवार, 22 मार्च 2018 (09:35 IST)

‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून त्याचा वेग वायफायपेक्षा १०० पट अधिक असणार आहे.  लायफाय’मध्ये प्रकाश लहरींच्या माध्यमातून इंटरनेट कार्यरत करण्यात येते. २०११ मध्ये स्कॉटलंडमधील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ हेरॉल्ड हास यांनी ‘लायफाय’चं संशोधन केलं आहे. वायर्डपेक्षा एलईडी प्रकाशाच्या माध्यमातून नेटवर्कचा वेग जास्त असतो, हे त्यांना आढळून आले आणि त्यानंतर यावर अधिक संशोधन करण्यात आले. आता हे तंत्रज्ञान अनेक देशांत रुजू लागले आहे. ‘लायफाय’ या तंत्रज्ञानाचा शोध २०११ पूर्वीच लागला होता. परंतु अपेक्षित वेग साध्य करता आला नाही. आताच्या ‘लायफाय’ तंत्रज्ञानात माहिती पाठविण्याचा वेग सेकंदाला १० गिगाबाइट्स इतका आहे.

 ‘लायफाय’ तंत्रज्ञानाचा वापर सध्या रशिया, फ्रान्स, इस्तोनिका, इंग्लंड (यूके) या देशांमध्ये केला जात आहे. ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना लक्षात घेता, भारतात हे तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जात आहे. ‘लायफाय’च्या माध्यमातून माणसाच्या डोळ्यांनाही चकवेल इतक्या वेगाने माहिती पाठवू शकता येते. वायफायच्या तुलनेत ‘लायफाय’चा आणखी एक फायदा असा, की यात संदेश हॅक करता येणार नाही.  ‘लायफाय’ या तंत्रज्ञानात एलईडी बल्बच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्यात येते. या बल्बमध्ये एक मायक्रोचिप बसवण्यात येते. ‘व्हिजिबल लाइट कम्युनिकेशन’ (व्हीएलसी) अर्थात ‘दृश्य प्रकाश वहन’या माध्यमातून ते काम करते. महत्त्वाचे म्हणजे बायनरी कोडमध्ये ट्रान्समिट होणारं हे तंत्रज्ञान आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेशात हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला, नंतर पेट्रोल ओतून जाळून टाकले

हे काय ! शिवसेनेच्या उमेदवाराने स्वतःच्याच नेत्याचा एबी फॉर्म फाडून गिळला

चालत्या व्हॅनमध्ये क्रूरता, नंतर पीडितेला रस्त्यावर फेकून दिले; या प्रकरणाने देशाला हादरवून टाकले

आदित्य ठाकरेंच्या कोअर टीमला मोठा धक्का: शीतल देवरुखकर-शेठ उद्धव ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये सामील

बीएमसी निवडणुकीत मतविभाजनाची भीती संपली ? ३२ जागांवर 'तिसरी आघाडी' नसेल, दोन आघाड्या आमनेसामने येतील

पुढील लेख
Show comments