Dharma Sangrah

नवे नियम लागू झाल्यास भारतात व्हॉट्‌सअ‍ॅप बंद होणार?

Webdunia
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019 (15:00 IST)
व्हॉट्‌सअ‍ॅपवरून अफवा पसरवणार्‍यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. भारतात व्यवसाय करणार्‍या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. परंतु, सरकारचे नियम कठोर असल्याने त्याचा उलटा परिणाम व्हॉट्‌सअ‍ॅपवर होण्याची शक्यता आहे. सरकारचे प्रस्तावित नियम जर लागू झाले तर भारतातील व्हॉट्‌सअ‍ॅपची सेवा बंद होऊ शकते, अशी भीती एका अधिकार्‍याने वर्तवली आहे.
 
व्हॉट्‌सअ‍ॅपचे जगभरात 1.5 अब्ज ग्राहक आहेत. तर भारतात 20 कोटी ग्राहक आहेत. सोशल मीडिया कंपन्यांसाठी जगातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ ही भारतात आहे. सरकारने या कंपन्यासाठी नवीन नियावली तयार केली आहे. प्रस्तावित नियमांमध्ये सर्वात जास्त चिंतेची बाब म्हणजे व्हॉट्‌सअ‍ॅपमधील मेसेजना ट्रेस करणे हे होय, असे व्हॉट्‌सअ‍ॅपचे कम्युनिकेशन प्रमुख कार्ल वूग यांनी सांगितले. व्हॉट्‌सअ‍ॅपमध्ये एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन फीचर आहे. या फीचरमुळे व्हॉट्‌सअ‍ॅपवर मेसेज पाठवणारा आणि ज्याला मेसेज मिळाला आहे, असे दोघेच हा मेसेज वाचू शकतात. इतकेच काय तर व्हॉट्‌सअ‍ॅप कंपनीही हे मेसेज वाचू शकत नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन फीचर खूप महत्त्वाचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे 1.06 कोटी रुपयांची फसवणूक

LIVE: पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

पुण्यातील हवा विषारी झाली, एक्यूआय 242 वर पोहोचला

इंडिगो संकटावर भारतीय रेल्वेची मोठी घोषणा, अडकलेल्या प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवणार

नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रभावित मार्गांसाठी कमाल भाडे मर्यादा निश्चित केली

पुढील लेख
Show comments