Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगली लोकसभा निवडणूक

Webdunia
मुख्य लढत : संजय पाटील (भाजप) विरुद्ध विशाल पाटील (स्वाभिमानी पक्ष) विरुद्ध
 
गोपीचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी)  
 
संजयकाका पाटील हे १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. संजयकाका पाटील हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र २०१४ च्या निवडणूकाआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. संजयकाका पाटील यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विद्यामान खासदार प्रतीक पाटील यांचा पराभव करत ते विजयी झाले.
 
लोकसभा निडवणुक २०१९ साठी जागावाटप करताना प्रदेश काँग्रेसने ही जागा थेट मित्रपक्षाला सोडली. काँग्रेसच्या कोट्यातून ही जागा शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. प्रदेश काँग्रेसच्या या निर्णयाचे तीव्र पडसात सांगली काँग्रेसमध्ये उमटले. त्यानंतर वसंत दादा घराण्याने बंड केले. माजी खासदार प्रतिक पाटील यांच्या रुपात काँग्रेस नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर पक्षांतर्गत हे बंड थोपविण्यासाठी विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यास प्रवृत्त करण्यात आले. आणि तात्पुरता तोडगा काढण्यात आला. त्यामुळे इते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार हा केवळ आणि केवळ नावालाच असून, तो पूर्णपणे काँग्रेसचाच आहे.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली. 
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments