Marathi Biodata Maker

लोकसभेची इव्हीएम व व्हीव्हीपॅट मधील मतमोजणी कशी होते, जाणून घ्या सविस्तर

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (08:40 IST)
देशातील सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव सुरु झाला आहे. मात्र अनेकांना प्रश्न पडला आहे की लोकसभेची ही मतमोजणी कशी होणार आहे, कश्या प्रकारे मशीन्स तपासल्या जाणार असून, त्यामुळे निकाल कधी लागणार. त्याबद्लची ही सर्वसाधारण माहिती. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या साधारण 18 ते 20 फेऱ्या होतील. तर  एका फेरीसाठी साधारणपणे 30 मिनीटे लागतात. 1 फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची स्वाक्षरी झाल्यानंतरच दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. तर  EVM मधील मतांची मोजणी सोबतच VVPAT व्हीव्हीपॅट मतांची मोजणी होईल. त्यामुळे प्रत्येक स्थितीत प्रत्येक फेरीसाठी जवळपास 40 ते 45 मिनीटे लागणार आहेत. त्यामुळे निकाल घोषित होण्यास उशीर होईल. मतदान मोजणीच्या दिवशी सकाळी 7 वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत EVM यंत्रे मतमोजणीसाठी स्ट्राँग रुममधून बाहेर येथील, मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी असणार आहेत. एक सुपरवायझर, एक सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहे. तर एका विधानसभा मतदारसंघातील 5 VVPAT मशिनची मते, प्रत्यक्ष EVM ची मते यांची पडताळणी करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. तर VVPAT मते, प्रत्यक्ष EVM मते यात फरक आढळल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला कळवणार आहे. त्यानंतर आयोग यावर अंतिम निर्णय देईल. तर दुसरीकडे मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यावर पूर्ण  बंदी टाकण्यात आली आहे. सोबतच आज 23 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रथम  पोस्टल मतदानाची मोजणी होईल. असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

LIVE: संभाजीनगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल संपल्याच्या अफवेमुळे घबराट

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवे वळण; पीडितेचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन तरुणांना अटक

जालना प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेलबाबत मोठा निर्णय; दुचाकींना २०० रुपयांचे इंधन, तर चारचाकींना २००० रुपयांचे इंधन दिले जाणार

गॅसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, सरकारने ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना रॉकेल पुरवण्याचा निर्णय घेतला

मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धाच्या संकटामुळे भारतात महागाई वाढेल का?

पुढील लेख
Show comments