Dharma Sangrah

राज्यात भाजपच्या एक हजार सभा मोदींची वर्ध्यात सुरुवात तर मुंबईत प्रचार सभेने शेवट

Webdunia
शनिवार, 30 मार्च 2019 (07:07 IST)
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर पकडला आहे. सर्वच पक्ष आता प्रचाराची रणनीती ठरवत असून त्यांचे प्रचारक मैदानात उतरवत आहेत. सत्ताधारी भाजपाने  प्रचाराची रणनीती ठरवाली असून, राज्यात भाजपा एक हजार सभा घेणार आहेत. यामध्ये सर्वच सभांचा समावेश करण्यात आला आहे. सभांसाठी राज्यातील,  केंद्रातील नेते देखील हजेर होणार आहेत. यामध्ये महत्त्वाची असलेली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील राज्यात आठ सभा आयोजित केल्या असून, याची सुरुवात एक एप्रिलपासून होत आहे. नरेंद्र मोदी यांची प्रथम जाहीर सभा वर्धा येथे एक एप्रिलला सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. तसेच मोदींची शेवटची सभा ही मुंबईत होणार आहे. 
 
राज्यामध्ये संभाना केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्या शह भाजपाचे इतर ज्येष्ठ जेते देखिल उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ७६ हून अधिक सभा राज्यामध्ये घेणार आहेत. त्यापैकी भाजपाच्या २५ उमेदवारांसाठी प्रत्यकी २ आशा मिळून ५० तर शिवसेना उमेदवारासाठी प्रत्येकी एक सभा आशा २३ सभा मुख्यमंत्री घेणार आहेत. त्यामुळे भाजपची आता प्रचाराची जोरदार तयारी झाली असून यामुळे विरोधकांना देखील तितक्याच ताकदीने त्यांच्या समोर उभे राहावे लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपुरतील महावितरण वीज यंत्रणा बळकट करणार

नीट पेपरफुटीमागील मुख्य सूत्रधारला पी. व्ही. कुलकर्णी याला पुण्यातून अटक

आषाढी वारीसाठी अहिल्यानगर प्रशासन सतर्क,जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केली

अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघातग्रस्तांसाठी पंतप्रधान मदत योजना राबविण्यात आली, १.५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार मोफत देणार

विदर्भात १५ जूनपासून शाळा पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान, शिक्षण विभागाला नोटीस बजावली

पुढील लेख
Show comments