Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाणीच नाही मग आम्ही मतदान करयच कुणाला - पुणेकरांचा गिरीश बापट यांना प्रश्न

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2019 (16:58 IST)
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचार आता अंतिम टप्प्यात असून, सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. सध्या छोट्या छोट्या सभा घेऊन उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हालाच मतदान करा असा, आग्रह करणाऱ्या उमेदवारांना आता नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र असून, याचा पहिला मोठा फटका पुण्यात भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना बसला आहे. मागील पाच वर्षे पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणारे पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना पुणेकरांच्या रोषाला सामोरे जावे लागले. बापट पुण्यातल्या कॅम्प परिसरात प्रचार करत होते, यावेळी जमलेल्या नागरिकांनी बापट यांना पाणी प्रश्नावरून चांगलंच घेरलं होते. 
 
आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस, महिने झगडतो आहोत अर्ज देत आहोत मात्र कोणतीच कारवाई होत नाही, आमच्या परिसरात आम्हाला पाणीच मिळत नाही, पुणे स्मार्ट शहर होतय तरी हे प्रश्न आहेत, मग  आता आम्ही मतदान का करावे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. परिसरामध्ये बापट पाणी पुरवू शकले नाहीत असा आरोप नागरिकांनी केला. तसेच, आता आम्हाला तर पाणीच मिळत नसेल तर आम्ही मतदान का करावे असा थेट प्रश्नच नागरिकांनी बापटांना तोंडावर विचारला आहे. नागरिकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गिरीश बापट गोंधळून गेले होते. नागरिकांना नक्की काय उत्तर द्यावे असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यांनी थातूरमातूर उत्तर देत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे येथे अनेक दिवसांपासून पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे, या आगोदर देखील अनेक प्रकारे पुण्यातील लोकांनी आपला राग व्यक्त केला आहे. मात्र आता निवडणुकीच्या तोडावर सुद्धा प्रश्न बाकी आहेत त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न मोठा मुद्द्दा होणार आहे.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments