Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किती थापा मारल्या याचा हिशोब द्या - राज ठाकरे

Webdunia
मंगळवार, 16 एप्रिल 2019 (09:16 IST)
मनसेच्या सभा खर्चाचा हिशोब मागण्यापेक्षा पाच वर्षात तुम्ही किती थापा मारल्या, त्याचा हिशोब करावा. रोज नवीन नवीन गोष्टी येतात, अन् मागचं सगळं लोक विसरून जातात. देशभरात भाषण करताना जी स्वप्न दाखवली गेली त्याबद्दल पंतप्रधान एकही शब्द काढायला तयार नाही अशी जोरदार  टीका राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केलीय. सोलापूर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा झाली त्यात राज ठाकरे बोलत होते. जाहीरसभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी राज ठाकरे यांनी भाजपाकडून मनसेच्या सभांचा खर्चाचा  हिशोब मागितला आहे त्याचा त्याचा जोरदार समाचार राज यांनी  घेतला आहे.
 
राज ठाकरे सभेत म्हणाले की, देशात स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या जाहिरातींवर नरेंद्र मोदी सरकारने 4880 कोटी रुपये खर्च केलेअसून, मेक इन इंडियाचं पुढे काय झालं? त्यातही स्मार्ट सिटी काय झालं? नाशिक महापालिका आणि उद्योगपती यांच्या पैशातून नाशिकमध्ये मनसेच्या काळात जी कामं केली ती स्मार्ट सिटीत का दाखवली आहेत. नरेंद्र मोदी यांना तीस वर्षानंतर देशात एकहाती बहुमत मिळालं होत, तुम्ही सांगितलेल्या स्वप्नावर लोकांनी आपल मतं तुम्हाला दिली आहे, मात्र आता लक्षात येतं की नरेंद्र मोदी देशाची खोटं बोलले. जे तुम्ही बोललात त्याबद्दल अवाक्षरंही काढलं जात नाही, तुम्ही आश्वासने आणि किती थापा दिल्या याचा हिशोब दिला पाहिजे असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख
Show comments