Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ईशान्य मुंबईची उमेदवारी मला द्या मी जिंकतो - रामदास आठवले

Webdunia
शनिवार, 30 मार्च 2019 (16:21 IST)
शिवसेना-भाजप युतीने  ईशान्य मुंबईतून मला उमेदवारी दिली तर  मी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून दाखवतो , असा दावा रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी केलाय. 

ईशान्य मुंबईचे भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेतून जोरदार विरोध आहे. जर  भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या  विरोधात मतदान करण्याची किंवा शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्याचा इशारा स्थानिक शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  दिला आहे.

या कारणामुळे  ईशान्य मुंबईतीत उमेदवार कोण असेल हे ठरत नाहीये. तर दुसरीकडे  रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा ईशान्य मुंबईतून लढण्याची इच्छा बोलून दाखवली असून, मतदारसंघात शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष आहे. त्यामुळे हा मतदारसंघ रिपाईच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवेन. या मतदारसंघातील लोक मला ओळखतात. यापूर्वी मी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली होती तेव्हा मला २.२५ लाख मते मिळाली होती, असे आठवले यांनी सांगितले आहे.

किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यामुळे शिवसैनिक प्रचंड रागात आहेत, सोमय्या यांना उमेदवारी दिली तर मतदान करणार नाही असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments