rashifal-2026

लोकसभा निवडणूक : यंदा मतदानाचा टक्का वाढेल का?

Webdunia
सोमवार, 22 एप्रिल 2019 (15:50 IST)
ग्रामीण भागातील दुष्काळ, शहरी उदासीनता आणि स्थलांतर या कारणामुंळे आजवर मतदानाची टक्केवारी फारशी वाढलेली नाही. परंतु यंदा मतदानाचा टक्का वाढावा याकरिता प्रशासनाकडून विविध स्वरुपाचे प्रयत्न केले गेले. तेव्हा यंदातरी मतदानाचा टक्का वाढेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जिल्ह्यामध्ये 2009 मध्ये स्वीप समिती स्थापन करण्यात आली. परंतु त्याचवर्षी सर्वात कमी मतदान झाल्याची नोंद आहे. तरीही निवडणूक आयोगमार्फत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये पथनाट्ये, मानवी साखळी, प्यारा शूटिंग, सायकल फेरी, प्रभात फेरी, पत्रकांचे वाटप, रांगोळी स्पर्धा असे अनेक प्रयत्न करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
 
विजयपूर जिल्ह्यातील 213 ग्रापंचातींच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या 649 खेड्यातील मतदारांना यंदा स्वीप समितीच्या सदस्यांनी भेटी दिल्या. रोजगारासाठी स्थलांतर केलेल मतदारांना मतदानाला गावाकडे येण्यासाठी विनंतीपत्रेही पाठविण्यात आली. तेव्हा यंदा तरी मतदान वाढेल का हे 23 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतरच कळू शकेल. जिल्ह्यातील प्रचार आता संपला आहे. मतदारांमध्ये सध्या मोठा उत्साह दिसून येत आहे. यंदा किती टक्के मतदान होते याची उत्सुकता लागून राहिली आहे.
 
लोकसभा निवडणुकीत 1952 पासून 2014 पर्यंत मतदानाची टक्केवारी पुढीलप्राणे : 
 
1952- 48.41, 1957- 50.36, 1962- 50.96, 1967- 59.30, 1971- 49.54, 1977- 58.49, 1980- 55.59, 1984- 61.76, 1989- 63.11, 1996- 47.39, 1998- 57.82, 1999- 63.9 (सर्वाधिक मतदान), 2004- 59.54, 2009- 47.29, (सर्वात कमी), 2014- 59.71.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?

पुणे विमानतळावर इंडिगोच्या 32 उड्डाणे रद्द, शेकडो प्रवासी अडकले

गोंदियातील गौसिया मशिदीने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली

LIVE: उरण मार्गावर अतिरिक्त उपनगरीय रेल्वे सेवांना मंजुरी देण्याची मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

केंद्र सरकारने इंडिगो प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments