Dharma Sangrah

राज्यातील या चार मतदारसंघाचा निकाल लागणार लवकर

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (08:43 IST)
देशभरात लोकसभा निकालाची आतुरतेने वाट सर्व बघत आहेत. तर मतदान मोजणी सुरु झाली आहे. महाराष्ट्रातही 48 लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय असेल याची सर्वाना उत्सुकता आहे. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता काही वेळातच मतमोजणीचे कल दिसू लागणार आहेत. मात्र  मतदारसंघनिहाय कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार आघाडीवर आहे हेही स्पष्ट होईल, तरीही अंतिम निकाल समजण्यासाठी उशिरापर्यंत सर्वाना वाट पाहावी लागणार आहे. मात्र त्यात राज्यातील 4 मतदारसंघांचा निकाल राज्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वातागोदर दिसणार आहे. यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, कल्याण, रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघांमध्ये सर्वात आधी निकाल येईल, कारण म्हणजे, मतदारसंघामधील मतदारांची संख्या, त्याच्या मोजणीसाठी लागणारा वेळ. 
 
दक्षिण मध्य मुंबईत 7 लाख 95 हजार 399 मतमोजणी करावी लागणार, सर्वात आधी दक्षिण मध्य मुंबईचाच निकाल  येईल. नंतर दक्षिण मुंबईत 7 लाख 99 हजार 612 मतमोजणी असीन, दक्षिण मुंबईच्या खालोखाल कल्याण, नंतर रत्नागिरी-सिंधुदूर्गचा क्रमांक असणार आहे. कल्याणमध्ये 8 लाख 88 हजार 183 आणि रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये 8 लाख 97 हजार 249 मतांची मोजणी करणे अपेक्षित आहे.त्यामुळे मुंबईचा निकाल सर्वात आगोदर कळणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

चंद्रशेखर बावनकुळे यांचे अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर

LIVE: प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना अल्टिमेटम दिला

महाराष्ट्रात राजकीय भूकंप: अजित पवार गटाचे १५-२० आमदार शरद पवारांच्या संपर्कात

४ विधान परिषद जागांसाठी भाजपमध्ये प्रचारमोहीम सुरू

महाराष्ट्रातील एसआयआरमधून २९ दशलक्ष मतदारांची नावे वगळण्यात येतील, प्रकाश आंबेडकरांचा दावा

पुढील लेख
Show comments