Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, रेल्वेने 2014 पाठवलेले खत 2018 साली पोहोचवले

Webdunia
सोमवार, 30 जुलै 2018 (09:08 IST)
भारतीय रेल्वेने 2014 साली पाठवलेले खत संबंधित स्थळी 2018 साली पोहोचवले आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून मालगाडीतून उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी खत पाठवले गेले. 2014 मध्ये ही मालगाडी तेथून निघाली. तिला 1400 किमी अंतर पार करुन बस्ती येथे जायचे होते. या खताची किंमत 10 लाख इतकी होती. बस्ती येथे खताची डिलिव्हरी झाली नसल्याचे लक्षात येताच भारतीय रेल्वेशी संपर्क करण्यात आला. मात्र रेल्वेला हे डबे शोधता आले नाहीत. हे डबे भारतभर एका स्टेशनमागे दुसऱ्य़ा स्टेशनमध्ये फिरत राहिले आणि शेवटी 3.5 वर्षांनी बस्ती येथे पोहोचले आहेत. यामधील सर्व खत खराब झाले असून त्याचे मालक रामचंद्र गुप्ता यांनी ते स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण गेली साडेतीन वर्षे रेल्वेक़डे चौकशी केली मात्र रेल्वेने कोणतेही उत्तर दिले नाही. आता हे खत खराब झाले असून त्याची भरपाई रेल्वेने द्यावी अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

तुर्कीमध्ये अडकलेले व्हर्जिन अटलांटिकचे विमान 2 दिवसांनी मुंबईत पोहोचले, प्रवाशांनाही एअरलाईनवर आरोप केले

मुंबई: जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वेगवान डंपरने पादचाऱ्याला चिरडले, चालकाला अटक

पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात यशस्वी जयस्वालच्या फॉर्मवर लक्ष ठेवले जाईल

आयपीएल फायनलपूर्वी नीरज चोप्रा या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत परतणार

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-योल यांना पदावरून काढून टाकण्यात आले

पुढील लेख
Show comments