Dharma Sangrah

येथे 21 विषारी साप देऊन मुलीला पाठवतात सासरी

Webdunia
शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (17:21 IST)
लग्नात नवीन सून आपल्यासोबत दागिने, कपडे, गाडी, रक्कम सोबत आणते परंतू एक जागी अशी देखील आहे जिथे मुलीकडील लोकं हुंड्यात विषारी साप देतात. हैराण करणारी ही परंपरा मध्यप्रदेशातील एका गावाची आहे. जिथे आजही लेकीला हुंड्या म्हणून बिषारी साप दिले जातात. 
 
मुलीला सासरी पाठवताना वडिलांना 21 विषारी साप द्यावे लागतात. हे साप इतके विषारी असतात की एखाद्या व्यक्तीला दंश केला तर मृत्यू होऊ शकतो. परंतू असे केले नाही तर मुलीच्या आयुष्यात दु:ख येऊ शकतात अशी समजूत आहे. येथील गौरेया समाजात ही प्रथा आहे. हुंड्यात दिले जाणारे साप हे गहुआ आणि डोमी प्रजातीचे असून अत्यंत विषारी असतात.
 
त्यातून विशेष म्हणजे साप पकडण्याची जबाबदारी ही मुलीच्या वडिलांची असते. लेकीसोबत साप दिले नाही तर लग्न मोडू शकतं किंवा काही अप्रिय घटना घडू शकते अशी शंका मनात असल्यामुळे ही परंपरा आजही पाळली जात आहे. 
 
गौरेया समजातील लोकं साप पकडण्याचंच काम करतात. ते साप पकडून सापाचे खेळ दाखवतात हेच कारण असावं की मुलीच्या लग्नात हुंडा म्हणून जावयाला विषारी साप दिले जातात. मुलीचं लग्न ठरलं की वडिला साप पकण्याचे काम सुरु करुन देतात. वनविभागाकडून या परंपरेबद्दल असलेली अंधश्रद्धा दूर करण्याचा खूप प्रयत्न केला गेला तरी ही प्रथा सुरु आहे. 
 
या समजातील लोकांना साप सुरिक्षत राहावे यासाठी कठोर नियम तयार केले गेले आहे. म्हणतात की जर सापाचा त्यांच्या पिटार्‍यात मृत्यू झाला तर पूर्ण कुटुंबाचे केस काढावे लागतात. तसेच समाजातील सर्व लोकांचे भोज आयोजित करावं लागतं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments