Dharma Sangrah

येथे 21 विषारी साप देऊन मुलीला पाठवतात सासरी

Webdunia
शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (17:21 IST)
लग्नात नवीन सून आपल्यासोबत दागिने, कपडे, गाडी, रक्कम सोबत आणते परंतू एक जागी अशी देखील आहे जिथे मुलीकडील लोकं हुंड्यात विषारी साप देतात. हैराण करणारी ही परंपरा मध्यप्रदेशातील एका गावाची आहे. जिथे आजही लेकीला हुंड्या म्हणून बिषारी साप दिले जातात. 
 
मुलीला सासरी पाठवताना वडिलांना 21 विषारी साप द्यावे लागतात. हे साप इतके विषारी असतात की एखाद्या व्यक्तीला दंश केला तर मृत्यू होऊ शकतो. परंतू असे केले नाही तर मुलीच्या आयुष्यात दु:ख येऊ शकतात अशी समजूत आहे. येथील गौरेया समाजात ही प्रथा आहे. हुंड्यात दिले जाणारे साप हे गहुआ आणि डोमी प्रजातीचे असून अत्यंत विषारी असतात.
 
त्यातून विशेष म्हणजे साप पकडण्याची जबाबदारी ही मुलीच्या वडिलांची असते. लेकीसोबत साप दिले नाही तर लग्न मोडू शकतं किंवा काही अप्रिय घटना घडू शकते अशी शंका मनात असल्यामुळे ही परंपरा आजही पाळली जात आहे. 
 
गौरेया समजातील लोकं साप पकडण्याचंच काम करतात. ते साप पकडून सापाचे खेळ दाखवतात हेच कारण असावं की मुलीच्या लग्नात हुंडा म्हणून जावयाला विषारी साप दिले जातात. मुलीचं लग्न ठरलं की वडिला साप पकण्याचे काम सुरु करुन देतात. वनविभागाकडून या परंपरेबद्दल असलेली अंधश्रद्धा दूर करण्याचा खूप प्रयत्न केला गेला तरी ही प्रथा सुरु आहे. 
 
या समजातील लोकांना साप सुरिक्षत राहावे यासाठी कठोर नियम तयार केले गेले आहे. म्हणतात की जर सापाचा त्यांच्या पिटार्‍यात मृत्यू झाला तर पूर्ण कुटुंबाचे केस काढावे लागतात. तसेच समाजातील सर्व लोकांचे भोज आयोजित करावं लागतं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

बंगळूरु मधील युगांडाच्या महिलेत इबोलाची लक्षणे, रुग्णालयात दाखल

जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी विशेष

पेट्रोलचा खर्च संपेल, एमजी कॉमेट ईव्ही खरेदी करण्यापूर्वी या ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

LIVE: 'हा' मोठा पक्ष शिंदे सेनेत विलीन होणार!

जळगावात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या चार मुलांना विहिरीत फेकून आत्महत्या केली

पुढील लेख
Show comments