Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अटलजींच्या प्रेमामुळे राजकारणात आलो

Webdunia
शनिवार, 18 ऑगस्ट 2018 (12:16 IST)
अटलजींचे माझ्यावर खूप प्रेम होते. अधूनमधून ते माझ्याशी राजकीय विषयांवर गप्पा मारायचे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची जादू होती. त्यांच्या प्रेमामुळेच मी राजकारणात आलो, अशी आठवण ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितली.
 
वाजपेयींच्या आठवणींना उजाळा देताना धर्मेंद्रना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात अटलजींना महत्त्वाचे स्थान होते. त्यांचे निधन हा माझ्यासाठी धक्का आहे. त्यांच्या प्रेमामुळेच मी राजकारणात सक्रिय झालो. त्यांच्याकडून बोलावणे आले तेव्हा त्यांच्याशी काय बोलावे हेच मला सुचत नव्हते. जेव्हा कधी मी त्यांच्याकडे जायचो, तेव्हा उभे राहून मला मिठी मारायचे. त्यांच्या कविता वाचून दाखवायचे. त्यांच्यासमोर मी निःशब्द होऊन जायचो. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा ते बोलायचे, मी फक्त ऐकत बसायचो.
 
वाजपेयींचे देशावर फार प्रेम होते. देशातील सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहावे अशी त्यांची इच्छा होती. या भावनेतूनच भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असेही धर्मेंद्र म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

वसतिगृहातील मुलांवरील लैंगिक शोषण प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी केली राज्य सरकार कडे ही मागणी

नाशिक : डीजेच्या आवाजामुळे कानातून-तोंडातून रक्त येऊ लागल्याने तरुणाचा मृत्यू

LIVE: ‘शिंदेनी पुन्हा काळी जादू केली!’ आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

धुळ्यात रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका आरोपीला अटक

नागपुरात देशातील पहिली स्किन बँक उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

पुढील लेख
Show comments