Dharma Sangrah

अटलजींच्या प्रेमामुळे राजकारणात आलो

Webdunia
शनिवार, 18 ऑगस्ट 2018 (12:16 IST)
अटलजींचे माझ्यावर खूप प्रेम होते. अधूनमधून ते माझ्याशी राजकीय विषयांवर गप्पा मारायचे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची जादू होती. त्यांच्या प्रेमामुळेच मी राजकारणात आलो, अशी आठवण ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी सांगितली.
 
वाजपेयींच्या आठवणींना उजाळा देताना धर्मेंद्रना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात अटलजींना महत्त्वाचे स्थान होते. त्यांचे निधन हा माझ्यासाठी धक्का आहे. त्यांच्या प्रेमामुळेच मी राजकारणात सक्रिय झालो. त्यांच्याकडून बोलावणे आले तेव्हा त्यांच्याशी काय बोलावे हेच मला सुचत नव्हते. जेव्हा कधी मी त्यांच्याकडे जायचो, तेव्हा उभे राहून मला मिठी मारायचे. त्यांच्या कविता वाचून दाखवायचे. त्यांच्यासमोर मी निःशब्द होऊन जायचो. आम्ही जेव्हा भेटायचो तेव्हा ते बोलायचे, मी फक्त ऐकत बसायचो.
 
वाजपेयींचे देशावर फार प्रेम होते. देशातील सगळ्यांनी गुण्यागोविंदाने राहावे अशी त्यांची इच्छा होती. या भावनेतूनच भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असेही धर्मेंद्र म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

फुगेवाडी (पिंपरी-चिंचवड) विषारी दारूकांडातील ४ मुख्य आरोपींना ८ जून पर्यंत पोलीस कोठडी

एक्सप्रेसवर दगडफेक केल्यास आता कारवाई होणार; रेल्वे आकाशातून निगराणी करणार

LIVE: महाराष्ट्राच्या १७ विधान परिषद जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक

आठ बछड्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय उद्यान गीरमधील सिंहांना रोगाचा धोका, वन विभागाचा सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक: पुणे जागेवर शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील हे उमेदवार

पुढील लेख
Show comments