Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नातवंडांची जबाबदारी 'आजी-आजोबां' ची नाही

नातवंडांची जबाबदारी  आजी-आजोबां  ची नाही
Webdunia
'आजी - आजोबा  काही पाळणाघरं नाहीत. नातवंडांची जबाबदारी आजी-आजोबांची नाही तर आई-वडिलांची आहे', अशा स्पष्ट शब्दांत कौटुंबिक न्यायालयानं पालकांची कान उघडणी केली. पुण्यातील एका महिलेनं आपली बाजू मांडताना आपले सासू - सासरे हे वेगळे राहत असून आपल्या मुलांची जबाबदारी टाळत असल्याचं म्हटलं होतं... त्यावर कौटुंबिक न्यायालयानं या महिलेला फटकारत हे वक्तव्य केलंय. 
 
 या प्रकरणात 20  वर्षांपूर्वी या महिलेचं लग्न झालं. नवरा - बायकोच्या भांडणामुळे मुलांना पाळणाघरात राहावं लागतंय. गेल्या दहा वर्षांपासून पती कामानिमित्तानं वेगळ्या शहरात राहतो. त्यामुळे त्याने  मुलांची आर्थिक जबाबदारीही त्यानं नाकारली. एकट्या आईवर मुलांची जबाबदारी आली.मुलांना पाळणाघरात ठेवावं लागतं. त्यासाठी वेगळा खर्च येतो. याबद्दल बोलताना सासू-सासरे आपल्या नातवंडांसोबत राहत नसून मुलासोबत त्याच्या घरी राहतात आणि त्यामुळे आपल्याला एकटीला हा खर्च पेलावा लागतो, असंही या महिलेचं म्हणणं होतं. मुलांची जबाबदारी ही आई-वडिलांची असल्याचं सांगत न्यायालयानं या मुलांच्या वडिलांना मुलांचा आर्थिक खर्च म्हणून महिलेला दरमहा 10 हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

पालघर मध्ये तरुणाने विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू श्वासाने घेऊन केली आत्महत्या

औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारक... वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

LIVE: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू

ठाणे: होळीच्या उत्सवादरम्यान एकाची हत्या, तिघांना अटक

सातारा : मंत्र्यावर छळाचा आरोप करणाऱ्या महिलेला खंडणीच्या आरोपाखाली अटक

पुढील लेख
Show comments