rashifal-2026

कोरोनाव्हायरस शरीरातून कायमचा जाण्यासाठी लागतो इतका कालावधी

Webdunia
बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (11:58 IST)
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला असून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याची लागण झालेले रुग्ण बरे होण्याची दर वाढत असली तरी काही देशांमध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोना संसर्ग होत असल्याचे धक्कादायक प्रकरणं देखील समोर येत आहे. अशात प्रश्न पडतो की कोरोना व्हायरस शरीरातून कायम जाण्यासाठी किती कालावधी लागतो?
 
यातच आता इटलीमधील शास्त्रज्ञांनी याबाबत माहिती देत सांगितले की कोरोना संक्रमित रुग्णाच्या शरीरातून व्हायरस जाण्यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागतो. अशात रुग्णांनी रिर्पोट पॉझिटिव्ह आल्यानंतर एका महिन्यांनी त्यांची दुसरी चाचणी केली पाहिजे.
 
सध्या जगात एकूण 2 कोटी 58 लाख 89 हजार 824 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 1 कोटी 81 लाख 72 हजार 671 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 8 लाख 60 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, जगभरात तब्बल 68 लाख 56 हजार 883 अॅक्टिव्ह रुगण आहेत. 
 
एवढेच नाही तर पाच निगेटिव्ह चाचणींपैकी एकाचा निकाल चुकीचा असू शकतो, असेही त्यांनी म्हटले.
 
Modena and Reggio Emilia युनिव्हर्सिटीचे डॉ. फ्रान्सिस्को व्हेंतुरेली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1162 रुग्णांचा अभ्यास केला. यात कोरोना रूग्णांची दुसरी चाचणी 15 दिवसांनी, तिसरी 14 दिवसांनी आणि चौथ्यांदा 9 दिवसांनी करण्यात आली. यात आढळून आले की पाच निगेटिव्ह चाचणींपैकी एकाचा निकाल चुकीचा असतो. या ‍रिर्पोटप्रमाणे 50 वर्षापर्यंतच्या वयोगटातील लोकांना 35 दिवस आणि 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या रुग्णांना पूर्ण पणे बरे होण्यासाठी 38 दिवस लागतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख