Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'ग्लोबल र्वॉंर्मिग'मुळे भारत गमावतोय थंड वातावरण

 ग्लोबल र्वॉंर्मिग मुळे भारत गमावतोय थंड वातावरण
Webdunia
शनिवार, 28 जुलै 2018 (00:15 IST)
ग्लोबल वॉर्मिंगमुळे थंडी कमी होत असलेल्या नऊ सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांमध्ये भारताचाही समावेश असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अध्ययनातून समोर आले आहे. यामुळे आरोग्य तसेच जलवायूचा धोका वाढू शकतो. धोरणकर्त्यांनी ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्या देशांना तत्काळ थंड ठेवण्यासाठी योग्य पावले उचलायला हवीत, असा सल्ला या अध्ययनातून देण्यात आला आहे. सरकार व गुंतवणूकदारांना सगळ्यांसाठी टिकाऊ शीतलता, साधान उपलब्ध करण्यातून मिळणारी उत्पादकता, रोजगार व वृद्धी लाभांसह विशाल वाणिज्य तसेच आर्थिक संधींचे आकलन करणे व त्यावर काम करण्यास सहकार्य करायला हवे. प्रोवाइडिंग सस्टेनेबल कुलिंग फॉर ऑल नावाचे हे पहिलेच अध्ययन असून त्यात जागतिक शीतलतेसमोरील वाढती आव्हाने व संधींचे आकलन करण्यात आले आहे. त्यात असे म्हटले आहे की, जागतिक पातळीवर सुारे 1.1 अब्ज लोक शीतलतेच्या कमतरतेच्या जोखमीची जोखीम उचलत आहे. शीतलता कोट्यवधी लोकांचे दारिद्र्य मिटविणे, मुलांना निरोगी ठेवणे, खापदार्थाध्ये पोषक घटक टिकवून ठेवणे, लस दीर्घकाळ प्रभावी ठेवणे व अर्थव्यवस्था मजबूत करण्यात मदत करते. उष्ण वातावरणाच्या विळख्यात असलेल्या 52 देशांतील आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. शीतलतेच्या अभावामुळे समस्यांचा सामना करत असलेल्या 1.1 अब्ज लोकांपैकी 47 कोटी लोक गरीब ग्रामीण भागातील आहेत. सकस आहार व औषधे त्यांच्यासाठी दुरापास्त आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

भारतात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगणा तालुक्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीची मृत्यू

LIVE: शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले राज्यात सीबीएसई पॅटर्न २ टप्प्यात लागू करणार

पालघर मध्ये तरुणाने विषारी कार्बन मोनोऑक्साइड वायू श्वासाने घेऊन केली आत्महत्या

औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारक... वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुढील लेख
Show comments