Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चोरटयांनी बोगदे खणून चक्क रेल्वेचे इंजिन चोरी केले, तिघांना अटक

Webdunia
शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (13:38 IST)
बिहारमध्ये चोरट्यांनी चोरीसाठी बरौनी ते मुजफ्फरपूर असा बोगदा खणून बरौनी येथील गरहारा यार्डमध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचे संपूर्ण डिझेल इंजिन चोरी केल्याची घटना घडली आहे. 
 
याबाबतची पहिली माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले . चौकशीदरम्यान त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, पोलिसांनी मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीमध्ये असलेल्या एका भंगार गोदामातून इंजिनच्या 13 पोती जप्त केल्या. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला यार्डाजवळ एक बोगदा सापडला, ज्यातून चोरटे यायचे आणि इंजिनचे पार्ट चोरायचे आणि बारीक पोत्यात घेऊन जायचे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एका टोळीने बरौनी (बेगुसराय जिल्हा) येथील गरहरा यार्ड येथे दुरुस्तीसाठी आणलेल्या ट्रेनचे संपूर्ण डिझेल इंजिन चोरून नेले होते. एकावेळी काही भाग चोरून या टोळीने हे साध्य केले. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतल्यावर पहिला शोध लागला आणि त्यांच्या माहितीच्या आधारे, त्यांनी मुझफ्फरपूरच्या प्रभात कॉलनीमध्ये असलेल्या एका भंगाराच्या गोदामातून इंजिनच्या भागांच्या 13 गोण्या जप्त केल्या. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे आम्हाला यार्डजवळ एक बोगदा सापडला, ज्यातून चोरटे यायचे आणि इंजिनचे पार्ट चोरायचे आणि बारीक पोत्यात घेऊन जायचे. याबाबत रेल्वे अधिकारी पूर्णपणे अनभिज्ञ होते. 
 
नुकतेच पूर्णिया जिल्‍ह्यात चोरांनी एक संपूर्ण विंटेज मीटर गेज वाफेचे इंजिन विकले, जे सार्वजनिक प्रदर्शनासाठी स्‍थानिक रेल्वे स्‍टेशनवर ठेवले होते. 

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments