Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तिरुपतीचे नियोजन करताय, मंदिर पूर्ण बंद राहणार

tirutpati
Webdunia
शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:34 IST)
तुम्ही तिरुपती बालाजीला जाणार आहात का ? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. या वर्षात पाच दिवस तिरुपती बालाजीचे दर्शन भक्तांना घेता येणार नाही. मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. ऑगस्ट महिन्यात तिरुपती बालाजी मंदिर पाच दिवस बंद ठेवण्याचा विचार तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) करत आहे. यामागे धार्मिक कारण आहे. प्रत्येक 12 वर्षांनी ‘अघमास’येतो त्यालाच ‘अस्ताबंधना बाललया महासंपरोकषनाम’असे देखील म्हटले जाते. ‘अघमास’ यंदा 12 ते 16 ऑगस्ट या काळात होणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन हा निर्णय घेणार आहे. मंदिरात प्रत्येक दिवशी 30 ते 35 हजार भक्त दर्शनासाठी येतात. पण ‘अघमास’दरम्यानच्या सर्व पूजा आणि दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. भक्तांनी दर्शनासाठी येण्याचे नियोजन करताना याचा विचार करावा, असे ‘टीटीडी’ने स्पष्ट केले आहे. देवस्थानाने या आधीच 12 ते 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्व अर्जिता सेवा रद्द केल्या. त्यामुळे मंदिर बंद राहणार हे उघड आहे. 
 
होणाऱ्या हा धार्मिक विधी 1958 पासून करण्यात येत आहे. प्रत्येक 12 वर्षांनी होणारी ही विशेष पूजा आहे. तिरुपती बालाजी आणि त्यांच्या कुटुंबाला दिर्घ आयुष्य मिळावे, अशी प्रार्थना करण्यात येते.  तिरुपती बालाजी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सर्व शक्ती एका पात्रात जमा होते. या काळात हे पात्र यज्ञशाळेत ठेवले जाते. ‘महासंपरोकषनाम’ची तयारी 20 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान केली जाणार आहे. त्यामुळे नियोजन असेल तर विचार करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याबद्दल जैन समुदाय संतप्त, बीएमसीच्या हुकूमशाहीवर संतप्त लोक उद्या भव्य रॅली काढणार

LIVE: मुंबईतील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याबद्दल जैन समुदाय संतप्त

राज ठाकरेंचे वर्तन तालिबानीसारखे...एफआयआर दाखल होणार! हिंदी भाषा सक्तीच्या वादावर गुणरत्न सदावर्ते यांची मागणी

पतीला उंदीर मारण्याचे विष दिले, पत्नीने प्रियकराला घरी बोलावून मृतदेह लटकवला फासावर

वधूच्या कृत्याने हैराण झालेल्या आयकर अधिकारी नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केली

पुढील लेख
Show comments