Festival Posters

एखादी व्यक्ती सतत बडबड करत असेल तर त्याला उत्तर देण्याची गरज नाही, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

Webdunia
गुरूवार, 2 मे 2024 (00:10 IST)
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरातील कस्तुरचंद पार्क येथे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर परेडची सलामी घेतली. त्यांनी राज्यातील जनतेला आणि जगातील तमाम मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राने ज्या पद्धतीने प्रगती केली आहे, त्यामुळे भविष्यात सर्वसामान्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण होतील आणि पुढेही वाटचाल करत राहील, असा माझा विश्वास आहे, असं ते म्हणाले. फडणवीसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. 

या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावत म्हणाले की, एखादी व्यक्ती सतत बडबड करत असेल तर त्याला उत्तर देण्याची काहीच गरज नाही. या वेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

ते म्हणाले, मंगळवारी निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदानाच्या टक्केवारीचे आकडे पाहता मतदानाची टक्केवारी कमी दिसत आहे. त्यामुळे जास्तीतजास्त मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कारण मतदान हा आपला हक्क आहे. ते बजावले पाहिजे.  
 
महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक प्रमुख जागांवर मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात ज्या प्रमुख जागांवर मतदान होणार आहे, त्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदार संघ, सांगली मतदार संघ, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा आणि हातकणंगले येथे मतदान होणार आहे.

Edited By- Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला

अंबरनाथ-बदलापूरला मेट्रो मिळणार, पाणीटंचाईवर कायमचा उपाय; मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठ्या घोषणा केल्या

मुंबई आणि नागपूर न्यायालयांमध्ये बॉम्बच्या बनावट धमकीमुळे घबराट पसरली, तासभर कामकाज ठप्प

सौरव गांगुलीने ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला; मेस्सीच्या कार्यक्रमाशी संबंधित प्रकरण

धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात परतण्यावरून राजकीय गोंधळ! सुप्रिया सुळे यांच्या इशाऱ्याला ओबीसी समुदायाने तीव्र प्रत्युत्तर दिले

पुढील लेख
Show comments