Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार कोटींचा फायदा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Webdunia
गुरूवार, 25 एप्रिल 2024 (00:40 IST)
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राळेगाव (यवतमाळ) येथील सभेत बोलताना राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
उपमुख्यमंत्री म्हणाले की, जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भाव घसरल्याने राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना 4000 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेमुळे खात्यात पैसे आले नाहीत. आचारसंहिता संपताच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले. त्यामुळे राज्य सरकारनेही सहा हजार रुपये दिले. जगभरातील काही देशांमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली. रशिया-युक्रेन युद्ध, इराण-इस्रायल युद्ध यामुळे कापसावर बंदी आली. त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले.
 
शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना 4000 कोटी रुपये दिले जातील. फडणवीस म्हणाले की, आचारसंहिता संपल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पिकाच्या भावातील तफावतनुसार पैसे जमा केले जातील. जाहीर सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे आणि गरिबांचे सरकार आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची मोठी रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे महाआघाडीतील सर्वच बड्या नेत्यांनी प्रचार सभांवर भर दिला आहे. महायुतीच्या यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे राजश्री पाटील आणि संजय देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे.
 
Edited By- Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments