Marathi Biodata Maker

महाराष्ट्रात कोणत्या तारखेला कुठे होणार मतदान?

Webdunia
रविवार, 17 मार्च 2024 (10:17 IST)
महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मतदारसंघ महाराष्ट्रात आहेत. तर त्याहून अधिक लोकसभा मतदारसंघ म्हणजेच 80 लोकसभा उत्तर प्रदेशात आहेत. ज्यामुळे त्या राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. मुंबईत महाराष्ट्रातील पाच टप्प्यांपैकी शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 20 मे ला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
 
महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ असून एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात होणाऱ्या पाच टप्प्यांमध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 07 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदार होणार असून 19 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या टप्प्यांत 5 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यांत 8 जागांसाठी, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रत्येकी 11 जागांसाठी आणि पाचव्या टप्प्यांत 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
 
महाराष्ट्रात असे होईल मतदान…
पहिला टप्पा (19 एप्रिल 2024) :
नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर
 
दुसरा टप्पा (26 एप्रिल 2024) :
बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी
 
तिसरा टप्पा (07 मे 2024) :
रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
 
चौथा टप्पा (13 मे 2024) :
नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
 
पाचवा टप्पा (20 मे 2024)
धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिंदी महासागरात एक जोरदार भूकंप झाला; रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.३ होती

LIVE: बेकायदेशीर बांगलादेशीवर कारवाई करण्यासाठी फडणवीस सरकारने निर्णय घेतला

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये एक नवीन वळण; उमेदवारांच्या मृत्यूमुळे तीन भागातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या

बेकायदेशीर बांगलादेशींची घुसखोरी ही एक गंभीर समस्या बनली; फडणवीस सरकारने कारवाईचा मोठा निर्णय घेतला

महिला T20लीगचे वेळापत्रक जाहिर

पुढील लेख
Show comments