Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

Amit Shah
, शुक्रवार, 17 मे 2024 (10:45 IST)
लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. भाजप बहुमताची आस लावून बसले आहे. तर इंडी युतीने प्रतिगमनाची पूर्ण तयारी केली आहे. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पार्टीच्या प्लॅन बी ला घेऊन अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर जबाब दिला आहे. 
 
अमित शाह म्हणाले की, भाजप जर बहुमताने विजय झाले नाही तर त्यांचा प्लॅन बी काय असेल? तर अमित शाह म्हणाले की, प्लॅन बी तेव्हा बनवला जातो जेव्हा प्लॅन ए फेल होण्याच्या 60 प्रतिशत परिणाम होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे. याकरिता प्लॅन बी बनवायचा प्रश्नच उठत नाही. 
 
लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यानंतर संविधान संशोधनाचा उल्लेख करत अमित शाह म्हणाले की, आमच्या जवळ मागील दहा वर्षांपासून बहुमत आहे आणि आम्ही ठरवले असते तर संविधान बदलवू शकलो असतो. पण आम्ही असे कधीच करणार नाही. बहुमताचा दुरुपयोग करण्याचा इतिहास माझ्या पार्टीचा नाही. बहुमताचा दुरुपयोग इंदिरा गांधी असतांना काँग्रेसने केला होता. 
 
अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करीत अमित शाह म्हणले की, मतदाताच्या रूपात मला वाटते की, ते जेव्हा जनतेमध्ये येतील तेव्हा लोकांना त्यांच्या दारू घोटाळा प्रकरण आठवेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'