Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपची सत्ता आल्यास पाकमध्ये सैन्य- राजनाथ

भाषा
मतांसाठी भाजपने आता पाकिस्तानशी युद्ध खेळण्याचा डाव मांडला आहे. भाजपची सत्ता केंद्रात आल्यास दहशतवाद चिरडण्यासाठी पाकिस्तानात सैन्य घुसवू असे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाची परवानगी मिळाल्यानंतरच हे पाऊल उचलू हे सांगून 'सावध' भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

भाजप सत्तेत आल्यास दहशतवाद चिरडण्यासाठी भारतीय लष्कराची मदत हवी काय असे पाकिस्तानला विचारण्यात येईल. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास ठीक. अन्यथा, यासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाऊन पाकिस्तानात सैन्य पाठविण्यासाठी त्यांची परवानगी घेतली जाईल, असे राजनाथसिंह म्हणाले.

अर्थात, पाकिस्तानने स्वतःहून दहशतवाद्यांवर कारवाई करावी आणि आपल्या देशात असलेले त्यांचे जाळे उध्वस्त करावे हीच आमचीही अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. कॉंग्रेसचे सरकार दहशतवादाला आळा घालण्यात साफ अपयशी ठरल्याचे त्यांनी मुंबई हल्ला व देशातील इतर दहशतवादी घटनांचे उदाहरण देऊन सांगितले.

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

स्वादिष्ट बीटरूट चीला कसा बनवायचा, रेसिपी जाणून घ्या

उन्हाळयात घाम कमी आल्यास येऊ शकतो ताप, वाढू शकतो उन्हाच्या झळी पासून धोका, जाणून घ्या लक्षणे, उपचार

आंब्यासोबत या पदार्थांचे सेवन केल्यास, शरीरात होईल विष तयार, जाणून घ्या कोणते आहे तीन पदार्थ

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

Show comments