Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'आप'चा परिणाम नाही; महाराष्‍ट्रात मनसेच 'बाप'

वेबदुनिया
WD
देशाची राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाने (आप) परिवर्तन घडवून आणले आहे. मात्र महाराष्ट्रात 'आप'चा परिणाम दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात आम्हीच 'बाप' असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज गुरुवारी केले. पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते.

जनतेची कामे केली नाहीत तर काय परिणाम होतो. हे दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. कॉग्रेससह अन्य मोठ्या पक्षांनी यापासून धडा घेतला पाहिजे. कॉंग्रेसने जनतेची कामे न केल्याचे त्यांना फळ मिळाले आहे. तसेच दिल्ली 'आप' जो बदल घडवून आणला तो चांगलाच असल्याचेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपने पंतप्रधानपदासाठी मोदींच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे होता, असेही मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आपल्याला प्रचंड आदर आहे. परंतु पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो. एका राज्याचा नसतो. त्यामुळे मोदींनी देशातील सर्व राज्यांचा विचार केला पाहिजे. मोदींनी मुंबईत येऊन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासोबत शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबतही बोलायला हवे होते, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

Show comments