Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंधळी कोशिंबीरचे कथानक

वेबदुनिया
PR
शब्दप्रधान विनोदनिर्मिती असलेला कौटुंबिक चित्रपट हे मराठी चित्रपटाचे बलस्थान आहे. नात्यांमधील घट्ट वीण, आपापसातील वाद-विवाद व त्यातून निर्माण होणारा विनोद यामुळे मराठी चित्रपट निखळ मनोरंजन करतो. सुधा प्रॉडक्शन या संस्थेची निर्मिती असलेल्या आगामी आंधळी कोशिंबीर या चित्रपटातून रसिकांना अशाच मनोरंजनाची मेजवानी चाखायला मिळणार आहे. अनुया म्हैसकर यांच्या सुधा प्रॉडक्शनतर्फे निर्मित आंधळी कोशिंबीर या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे करत आहेत. सध्या पुणे परिसरामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. याविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, ‘सध्या समाजामध्ये अनेक नातेसंबंधांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असतात. त्यामुळे त्यांच्यामधील नातेसंबंध विकसित होत असताना त्यांच्या जाणिवा, विचार बदलत असतात. जेव्हा असे चार वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन एक कुटुंब बनते तेव्हा एकच गोंधळ उडतो. अशा गोंधळातून चांगला विनोद निर्माण होतो.

या चित्रपटांमधून तीन पिढय़ांमधील कलाकार एकत्र येत आहेत. तसेच बर्‍याच वर्षानंतर अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिकेचा आस्वाद या चित्रपटामधून रसिकांना घेता येणार आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments