Marathi Biodata Maker

वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला

Webdunia
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024 (18:17 IST)
20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे . मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.स्पर्धेतून माघार घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे.निवडणुकाच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष लागले असून उमेदवार अर्ज दाखल करत आहे. 

वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला.मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात मोठ्या लढतीची तयारी झाली आहे आणि ते शिवसेनेचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी लढतील. काँग्रेसचे माजी नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री देवरा यांनी या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि नंतर राज्यसभेवर निवडून आले. राज्यसभेवर सहा वर्षांचा कार्यकाळ असतानाही देवरा यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने पक्षाकडून 
उमेदवारांची दुसरी यादी रविवारी जाहीर करण्यात आली. या यादीत मिलिंद देवरा यांना वरळी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.या नंतर मिलिंद देवरायांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. 
 
मिलिंद देवरा यांची लढत शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे यांच्याशी होणार आहे. 
मनसेचे संदीप देशपांडे यांनी देखील वरळी मतदार संघातून उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यामुळे आता तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

बस उलटल्याने भीषण रस्ता अपघात, ४० प्रवासी जखमी

अनमोल बिश्नोईला भारतात आणण्यात आले, एनआयएने अटक केली

'भाजपला आता शिंदेंची गरज नाही', शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीतील राजकीय तणावाच्या वृत्तांना टोमणा

मामाच्या प्रेमासाठी अल्पवयीन मुलीने घरातून पळ काढला, पण तिला आपला जीव गमवावा लागला; वसई मधील घटना

मानवभक्षी बिबट्यांची नसबंदी केली जाणार; महाराष्ट्र राज्याचा मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments