suvichar

पहिला निर्णय व्हावा आणि नंतर कामकाज चालावं : फडणवीस

Webdunia
शुक्रवार, 4 मार्च 2022 (14:43 IST)
ओबीसी आरक्षणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सरकारला विशेषतः छगन भुजबळांना धारेवर धरलंय. त्यानंतर विधानसभेच्या बाहेर येत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोलही केला.
 
दोन वर्षं फायलींवर बसून होते, मंत्री मोर्चे काढतात. मंत्री भाषणं करतात. मंत्री केंद्राकडे बोट दाखवतात. पण स्वतः मात्र कुठलीही कारवाई करत नाहीत. अशा प्रकारचं हे काम पाहिल्यानंतर आम्हाला आता शंका उत्पन्न झालीय. ओबीसींना हे आरक्षण द्यायचंच नाहीये. निवडणुका झाल्यानंतर हे आरक्षणाचा कायदा आणतील. बिना आरक्षणाच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात या सरकारच्या काही प्रमुख लोकांचा दबाव आहे. काही प्रमुख लोक प्रयत्न करतायत की, कुठल्याही परिस्थितीत आरक्षण न मिळता निवडणुका पार पाडाव्यात. म्हणजे पुढील पाच वर्षे ओबीसींना एकही जागा महापालिका, जिल्हा परिषदा किंवा नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये मिळणार नाहीत. म्हणून यासंदर्भात पहिला निर्णय व्हावा आणि नंतर कामकाज चालावं, अशी आमची मागणी आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.
 
छगन भुजबळ भूमिका मांडतात आणि मंत्रिमंडळातील निर्णय वेगळेच दिसतात. तिसरीकडे सर्वोच्च न्यायालयात चौथ्याच गोष्टी मांडल्या जातात. त्यामुळे मला असं वाटतं भुजबळ साहेबांना केवळ बोलण्याची भूमिका दिलीय. करविते धनी मात्र वेगळंच काही तरी करतायत. म्हणून या ठिकाणी ओबीसींना आरक्षण मिळत नाहीये. कुठल्यात देशामध्ये यासंदर्भातील सर्व्हे झालेला नाही. राज्य सरकारच्या डेडिकेशन कमिशनने करायचा हा डेटा आहे. जाणीवपूर्वक हा करत नाही. दोन महिन्यात सरकारनं इम्पेरिकल डेटा तयार करावा आणि नंतर या निवडणुका घ्याव्यात, अशी आमची मागणी आहे, असंही ते म्हणालेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बारामती पोटनिवडणूक : काँग्रेसने माघार घेतल्यानंतर ३० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली

प्रमाणपत्रासाठी लाच मागणे महागात पडले, एसीबीची कारवाई; मुख्याध्यापिकेला अटक

IPL 2026 कोलकाताला हरवून लखनौ अव्वल ५ मध्ये दाखल, गुणतालिकेत बदल

अजितदादांच्या खास लूकमध्ये पार्थ पवार यांनी खासदारकीची शपथ घेतली

अलविदा, बिहार! नितीश कुमार दिल्लीत परतले, आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेणार

पुढील लेख
Show comments