Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता 15 मिनिटांत मुंबई ते एलिफंटा प्रवास

Webdunia
मंगळवार, 26 मे 2015 (14:39 IST)
मुंबईच्या गेट वे ऑॅफ इंडियावरुन फेरी बोटने एलिफंटावरील गुहा पाहण्यासाठी पर्यटकांना जावे लागत होते. 
 
हा प्रवास एक ते दीड तासांचा आहे. मात्र आता फक्त 15 मिनिटांमध्ये एलिफंटाला पोहोचता येणार आहे आणि तेही नवी मुंबईतून. हिंदजल प्रवासी वाहतूक सहकारी संस्थेने सीबीडी ते एलिफंटा प्रवासी बोट सुरू केली असून तिच्या दिवसातून दोन फेर्‍या ठेवण्यात आल्या आहेत.
 
आधुनिक अशी व्हिएतनाम मेड बोट असून ती 35 ते 40 नॉटिकल स्पीडने चालते. त्यामुळे फक्त 15 मिनिटांत नवी मुंबईवरुन एलिफंटाला पोहोचता येणार आहे. 
 
या बोटीमध्ये एकून 45 प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे वातानुकूलित सिटही यामध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
 
नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि इतर भागातील लोकांना जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्या पाहायला जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास करून मुंबईच्या गेट वे ऑॅफ इंडियाला जावे लागत होते. दररोज सकाळी 9 वाजता पहिली बोट सुटेल आणि तीच बोट दुपारी 1 वाजता प्रवाशांना परत घेऊन येईल. यानंतर दुपारी 2 वाजता दुसरी बोट सुटेल ती सायंकाळी 6 वाजता परत येईल.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करू शकले नाहीत, सोशल मीडिया वर सांगितले

यदाद्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, सर्वात भव्य मंदिर

यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

चित्रपटाच्या सीक्वलनंतर कमल हासन 'इंडियन 3'च्या तयारीला!

Show comments