पुढील पानावर पाहा पेंच राष्ट्रीय उद्यान
पेंच राष्ट्रीय उद्या न
नागपूरपासून ६५ कि.मी. अंतरावर जबलपूर रस्त्यावर पेंच नदीच्या तीरावर हे उद्यान वसले आहे. साग, शिसवी, ऐन, तीवस, मोह, खर ही प्रमुख झाडे येथे पाहायला मिळतील. जवळपास २०० जातींचे पक्षी या उद्यानात आढळतात. नागपूर जिल्ह्यातील गोलिया पहाड हे उंच शिखर उद्यानाच्या पूर्व भागात आहे. सिलारी, तोतलाडोह, राणीडोह इथे विश्रामगृह उपलब्ध आहेत.
मेळघा ट
अमरावती जिल्ह्यातील सातपुडय़ाच्या दक्षिणेकडील रांगांच्या परिसरात मेळघाटात सर्वाच्या परिचयाचा व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. मेळघाटातून सिपना, खंडू, खापरा, डोलारा आणि गंडगा या पाच नद्या वाहतात. चोहोबाजूंनी आलेल्या घाटांचा मेळ असा हा मेळघाटचा अर्थ होतो. १५९७ चौ.कि.मी इतके क्षेत्र या प्रकल्पात मोडते. साग विपुल असणाऱ्या या जंगलात घाणेरीच्या घनदाट जाळ्या आणि बांबूंची बेटंही विराजमान आहेत. राहण्याची सोय असून, जंगलातून रात्री फेरफटका मारण्यासाठी मिनी बस आहेत. भेकर, सांब, गवे येथे विपूल प्रमाणात आढळतात.
पुढील पानावर पाहा राधानगरी-दाजीपूर
राधानगरी-दाजीपूर
सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर म्हणजेच कोल्हापूर-फोंडा रस्त्यावर ४८ कि.मी. अंतरावर हे अरण्य वसले आहे. येथे पिसा, जांभूळ, आंबा, हिरडा असे वृक्ष आढळतात. त्याचबरोबर रानकोंबडय़ा, बिबटे, खवली मांजरे, रानडुकरं येथे आढळतात. येथे राहण्याची उत्तम सोय आहे. त्यामुळे किमान तीन दिवस तरी येथे भेट द्यायला हरकत नाही.
याव्यतिरिक्त नवे गाव बांधा, रेहेकुरी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यन, भीमाशंकर, कर्नाळा अभयारण्य, तानसा, किनवट, सागरेश्वर अशी अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रात वसलेली आहेत.