Dharma Sangrah

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान : किल्ले पद्मगड

Webdunia
शुक्रवार, 23 जुलै 2021 (21:30 IST)
सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर तीन दुर्गांची निर्मिती केली. ते म्हणजे पद्मगड, राजकोट, आणि सर्जेकोट हे होय.
 
सिंधुदुर्ग आणि पद्मगड समोरासमोर आहेत. किनार्‍यावरुन सिंधुदुर्गाकडे पाहील्यास डावीकडे पद्मगड तर उजव्या किनार्‍याच्या भूशीरावर राजकोट आहे. सर्जेकोट ४ कि.मी. अंतरावर आहे.
 
पद्मगडाला चालत जाता येते. त्यासाठी सागराला ओहोटी असावी लागते. भरती-ओहोटेचे वेळापत्रक पाहून आपण पद्मगडाकडे चालू लागावे.
 
पद्मगडाकडे जाताना किनार्‍यावर दांडगेश्वराचे मंदिर लागते. या मंदिराच्या समोर सिंधुदुर्गाकडे सागरात शिरलेली वाळूची पुळण दिसते. मागे त्सुनामी (सुनामी) आली होती त्यावेळी येथील मधल्या भागातील सर्व पुळणच वाहून गेली होती. त्यामुळे या भागात मोठय़ाप्रमाणात खोलगट भाग तयार झाला होता. तेव्हा ओहोटीच्या वेळी सुद्धा पुरुषभरापेक्षा जादा उंचीचे पाणी असायचे. त्यावेळी एखाद्या होडीनेय पद्मगडाकडे जावे लागायचे.
 
गेल्या काही वर्षामधे पुन्हा साठल्यामुळे ओहोटीच्या वेळी कमरे एवढय़ा पाण्यातून जाता येते. या नैसर्गिक अडचणीमुळे आणि पद्मगडाची माहिती नसल्यामुळे पर्यटक, इकडे फिरकत नाहीत.
 
मालवणच्या धक्क्यापासून पद्मगडापर्यंत येण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. रचिव दगडांनी पद्मगडाची तटबंदी उभारलेली आहे. याचा दाखला बरोबर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दरवाजासमोरच आहे. किल्ल्याच्या लहानशा दरवाजातून आत गेल्यावर वेताळ मंदिर आहे. मालवणच्या कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असल्याने त्यांची नित्यनियमाने ये जा चालू असते त्यामुळे वेताळाची नियमित पुजाअर्चाही होत असते. त्यांनी तटावर अनेक भगवे झेंडेही उभे केलेले दिसतात. येथिल तटबंदीवरुन मालवणच्या किनार्‍याचे सुरेख दर्शन घडते. सिंधुदुर्गची प्रचंड तटबंदीही चांगलीच नजरेत भरते. किल्ल्यामधे एक कोरडी पडलेली विहीर आहे.
 
पद्मगडाच्या तटबंदी आणि येथिल झुडुपांमधे कावळ्याची मोठी वसाहत असल्याने कावळ्यांची मोठी फौज सतत कावकाव करीत आपला पिच्छा पुरवत असते.
 
पद्मगडाचा उपयोग शिवकाळामधे गलबतांच्या दुरुस्तीसाठी केला जायचा. त्यासाठी भरती ओहोटीच्या वेळा साधून या खडकाळ बेटावरील धक्क्यावर गलबते आणली जात असत. या गोदीत दुरुस्त झालेली अथवा नव्याने बांधलेली मध्यम आकाराची गलबते भरतीच्या वेळी बाहेर काढून खुल्या सागरात दाखल होत असत.
 
या शिवकालीन गोदीचे काहीसे अवशेष दिसतात. ते पाहून पुन्हा चालत दांडगेश्वराच्या मंदिराकडे निघावे. पुन्हा तसेच पुढे गेल्यावर मोरयाचा धोंडा लागतो. त्याच्या भोवती उभे केलेले भगवे झेंडे आपले लक्ष दूरुनच वेधून घेतात. या घौडय़ावर गणेश, चंद्र, सूर्य, शिवलिंग, नदी व पादुका आजही दिसतात. सिंधुदुर्गाची निर्मिती करण्यापूर्वी शिवरायांनी येथेच यथासांग पुजा केली होती.
 
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर पाहून आणि पद्मगडाची भेटीच्या आठवणी घेवून पुन्हा मालवणच्या धक्क्याकडे चालू लागावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

सुपरस्टार मोहनलाल यांच्या आईचे निधन

New Year 2026 परंपरा, निसर्ग आणि आधुनिकतेचे मिश्रण असलेली ही ठिकाणे आहे सकारात्मकतेचा भौगोलिक स्रोत

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

पुढील लेख
Show comments