Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे, नागपूरात आयपीएल सामने नाहीत?

Webdunia
मंगळवार, 12 एप्रिल 2016 (10:55 IST)
दुष्काळाची झळ बसल्याने अखेर आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे काही सामने महाराष्ट्रात न होता बाहेरच्या राज्यात खेळविले जाण्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर आणि पुण्यातील ५ सामने राज्याबाहेर स्थानांतरित होऊ शकतात, असे संकेत आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिले आहेत.
 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयपीएल सामन्यांना परवानगी देऊ नये, यासाठी न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
 
न्यायालयाने बीसीसीआयची कानउघाडणी करीत मुंबई, पुणे आणि नागपुरात होणारे सामने राज्याबाहेर हलविण्यास सांगितले होते.
 
दरम्यान, आयपीएल फ्रॅन्चायझींना आयोजनात त्रास होण्याची शक्यता असल्याने नागपुरातील तीन आणि पुण्यात होणार्‍या दोन प्लेऑफ सामन्यांचे आयोजन इतरत्र होऊ शकते, असे संकेत शुक्ला यांनी दिले आहेत.

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Show comments