Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'ना'तु'ला ना मला, विजय राष्ट्रवादीला

वेबदुनिया
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2009 (12:50 IST)
सेना-भाजप युतीला एक-एक जागा महत्वपूर्ण असतानाच खुर्चीची आस आणि स्वार्थ साधण्याचे परिणाम शिवसेनेसह भाजपला भोगावे लागले. दोघांचे भांडणा अन्‌ तिसर्‍याचा लाभ अशी स्थिती येथे झाली असून रामदास कदम आणि डॉ. विनय नातू यांच्या वादात राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी बाजी मारली. कदम, नातूंपैकी कोणीही माघार घेतली असती तर जिल्ह्यातील युतीला एक हक्काची जागा गमवावी लागली नसती.

रत्नागिरी जिल्हा हा १९९० पासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे १९९५ ला मिळालेल्या सत्तेत कोकणचा सहभाग महत्वाचा होता. सातही जागांवर सेनेचेच वर्चस्व होता. पहिला सुरुंग राष्ट्रवादीने २००४ च्या निवडणुकीत चिपळूण आणि रत्नागिरीत लावला. त्यानंतर संगमेश्वर व राजापूरात काँग्रेसने जागा बळकावून दुसरा धक्का दिला. जिल्ह्यात खेड, गुहागर आणि दापोली या तीन जागांवरच वर्चस्व होते.

मतदारसंघ फेररचनेनंतर खेड, संगमेश्वर दोन मतदारसंघ रद्द झाले. त्यात विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या गडांतर आले. त्यामुळे पाच जागांवर उमेदवार निवडताना सेना-भाजपमध्ये कलगी-तुरा रंगला होता. २००९ च्या निवडणुकीत सेनेचे वर्चस्व राहील असा अंदाज होता. मात्र गुहागरने सेना-भाजपला जबरदस्त हादरा दिला. भाजपचा परंपरागत मानला जाणारा गुहागर मतदारसंघ रामदास कदम यांच्यासाठी सेनेला सोडण्यात आला. हक्काची जागा सुटल्याने भाजपच्या डॉ. विनय नातूंनी बंडाचा झेंडा फडकविला. एकेकाळचे सहकारी कदम-नातू या निवडणुकीत आमने-सामने उतरले. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव रिंगणात असल्याने या मतदारसंघातील चुरस वाढली. निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता होती.

सेना-भाजपचे हे दोन्ही खंदे समर्थक एकमेकाच्या निर्णयावर ठाम राहिले. दोघांनाही खुर्ची सोडवीत नसल्याने आणि भविष्यात आपली राजकीय कारकीर्द संपविण्याची भीती असल्याने ते निवडून येण्यासाठी धडपडत होते. रामदास कदम यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. तर डॉ. नातू यांनी परंपरागत मतांवर भर दिला होता. या चित्रात भास्कर जाधव लांबच होते. त्यामुळे विजयाचे दावेदार म्हणून नातू-कदम यांची नावे घेतली जात होती. पण निवडणूक निकाल अखेर धक्कादायक लागला. भास्कर जाधव यांनी बाजी मारत कदम-नातूंची राजकीय कारकीर्दच धोक्यात आणली आहे. तर दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ अशी स्थिती झाली येथे झाली आहे. ङङ्गखुर्ची'ने केला गुहागरात सेना-भाजपचा घात अशाच प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून उमटत आहेत.

मला पाकिस्तानी चाहते खूप आवडतात, रोहित शर्माचे मोठे विधान

12वीचा निकाल आज लागणार

अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजी नगर मधून अटक

2.44 कोटी रुपयांची कार, परवाना किंवा नोंदणी नाही; पुण्यातील अपघातात अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक

राज्यात 17 जिल्ह्यात कोसळणार पाऊस, अवकाळी पावसाचा इशारा

'सीतेला चोरायला रावण देखील भगवे कपडे घालून आला होता',सीएम योगी यांबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षांचा वादग्रस्त जबाब

Bus Accident : मध्य प्रदेशातील राजगडमध्ये भीषण रस्ता अपघात,बस पुलावरून खाली कोसळली, 2 ठार 52 प्रवासी जखमी

Pune Porsche Accident:अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, सीसीटीव्ही फुटेज वरून उघड

KKR vs SRH: अंतिम फेरी गाठण्यासाठी KKR आणि SRH यांच्यात लढत होणार!सामना कुठे आणि कोणत्या वेळी जाणून घ्या

चीनमध्ये एका प्राथमिक शाळेत चाकू हल्ल्यात दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

Show comments