Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेच्या दणक्यात सेना-भाजपची लागली वाट

वेबदुनिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्याने आघाडी सरकारचा फायदा झाला असून, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी सुरू झाली असून, यात मनसेमुळे सेनेला अनेक जागांवर फटका बसला आहे. मनसेच्या मुसंडीने राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सेना- भाजपला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर आघाडीचेच सरकार येणार असल्याचे चित्र दिसत असून, मनसे 15 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. सेनेला मनसे फॅक्टरचा चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. मुंबईत मराठी माणसाने आपला कैवारी म्हणून मनसेच्याच पारड्यात भरभरून मते टाकल्या्चे दिसते आहे. त्यामुळे मुंबईवर शिवसेनेचे असलेले दीर्घ वर्चस्व संपुष्टात येण्याची स्पष्ट चिन्हे आता दिसू लागली आहेत.

काही झाले तरी युतीला पाठिंबा देणार नसल्याचे मनसेने यापूर्वीच स्पष्ट केले असून, यामुळे आघाडी सरकार सत्तेवर येणार हे निश्चित मानले जात आहे.

मनसेचा फायदा झाल्याचे आता कॉग्रेस आणि आघाडीच्या नेत्यांनी मान्य केले आहे. मनसेच्या उमेदवारांनी मतं खाल्ल्याने अनेक जागांवर आघाडीच्या उमेदवारांचा फायदा झाल्याचे उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मान्य केले आहे. शरद पवारांनीही दिल्लीत अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments