Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार कुठल्या तोंडाने जनतेकडे मतं मागायला येते? – अजित पवार

Webdunia
फडणवीस सरकार महाजनादेश यात्रा काढतेय. पण पाच वर्षे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केलेली नाही, तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला नाही, किंवा जनसामान्यांचे प्रश्न सुटले नाहीत, मग हे सरकार कुठल्या तोंडाने मतं मागायला येते? असा प्रश्न अजित पवार यांनी केला.
 
पुढे पवार म्हणाले की, राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पीकविमा कंपन्या पैसे खात आहेत. शिवसेना त्यांच्या विरोधात मोर्चे काढत आहेत. शिवसेनेला सांगायला हवे की ते सरकारमध्ये आहेत, मोर्चे कसले काढता, निर्णय घ्या..
 
गेली पाच वर्षे भाजपाने काम केले असते तर फडणवीस यांना महाजनादेशयात्रा काढायची गरज पडली नसती. मुख्यमंत्र्यांना जनतेने डोक्यावर घेतले पण हे सरकार फसवे निघाले, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुडे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना असंख्य आश्वासने दिली. मात्र निवडणूक जिंकून आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांना विसरले. फडणवीस जरी शेतकऱ्यांना विसरले असतील तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधी विसरू शकत नाही, म्हणून आज आम्ही सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात आवाज उठवत आहोत, असेही मुंडे म्हणाले.
 
तसेच खा. अमोल कोल्हे यांनीदेखील यावेळी सरकारला धारेवर धरले. काम केले तर ते सांगण्याची गरज पडत नाही, उलट काम केले नाही तर उर बडवून सांगावे लागते. मुख्यमंत्री महाजनादेशयात्रा काढून तेच करत आहेत, असे कोल्हे म्हणाले. किनवट येथे एका ठिकाणी बॅनर लावलेले पाहिले की महाराष्ट्राचा राजा देवेंद्र... रेणुका मातेच्या साक्षीने सांगतो की, चंद्र-सूर्य असेपर्यंत महाराष्ट्राचे राजे एकच... छत्रपती शिवाजी महाराज... असा खोडसाळपणा यापुढे सहन केला जाणार नाही, असा इशाराही कोल्हे यांनी दिला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments