Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते
Webdunia
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (16:08 IST)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. यासाठी राष्ट्रवादीला २४ तासांची मुदत देखील देण्यात आली. त्यामुळे सत्ता मिळवायची असेल तर आज रात्री साडे आठ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला १४५ आमदारांचा पाठिंबा असल्यचा दावा राज्यपालांसमोर सिद्ध करता यायला हवे. राष्ट्रवादीला राज्यपालांकडे आज संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. दरम्यान, राज्यपालांनी दिलेल्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या जलद गतीने घडामोडी घडत आहेत.
 
सुरुवातीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नियमानुसार सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भाजप पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. यासाठी राज्यपालांकडून भाजपला ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. भाजप आणि शिवसेना यांनी निवडणुकीपूर्वी युती जाहीर केली होती. मात्र, निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले. अखेर शिवसेनेची मनधरणी करण्यात भाजपला अपयश आले आणि भाजपने सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतून माघार घेतली. राज्यपालांनी राज्यातील सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणजे शिवसेना पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. यासाठी राज्यपालांकडून २४ तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र, २४ तासांत शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करु शकली नाही. राज्यपालांनी नियमानुसार थर्ड लार्जेस्ट पार्टी ठरलेल्या राष्ट्रवादी पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

नागपूर हिंसाचारात जबाबदार लोकांवर कारवाई होणार- भाजप नेते उज्ज्वल निकम

Nasik Kumbh: 2027 च्या नाशिक कुंभमेळ्याची तयारी मंद गतीने सुरू आव्हानांवर मात करू', मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

नागपूरमधील सर्व भागातून 6 दिवसांनी संचारबंदी उठवली, संवेदनशील भागात गस्त सुरूच

Nagpur Violence: नागपूर हिंसाचाराचा बांगलादेशशी संबंध असल्याचा शिवसेना नेते संजय निरुपम यांचा दावा

पुढील लेख
Show comments