Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अदित्य ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यास आम्ही कधीही तयार मुख्यमंत्री

Webdunia
सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (08:31 IST)
शिवसेनेचे युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यास आम्ही कधीही तयार आहोत. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे पहिलेच असतील आणि ते सरकारमध्ये सहभागी झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. ‘महा जनादेश यात्रे’दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना आदित्य ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस यांनी हे मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. गेल्या वेळी २०१४ मध्ये शिवसेनेच युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने १४४ जागा लढवून १२२ जागा जिंकल्या होत्या. आता अर्ध्या जागा घेऊन काही मित्रपक्षांनाही देण्याचा आमचा मानस आहे. आता आम्ही किती जागा जिंकू ते नक्की सांगता येणार नाही, मात्र यावेळचा विजय ऐतिहासिक असेल इतके नक्की, असेही फडणवीस म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी भाजप-शिवसेना युती होणारच हे स्पष्ट आहे. आम्ही मोठा पक्ष असलो तरी मित्रपक्षाला बाजूला सारायचे ही आमची नीती नाही. आम्ही समान जागांवर लढणार आहोत. या जागा १३० ते १४० इतक्या असतील. उर्वरित जागा आम्हाला मित्रपक्षांनाही द्यायच्या आहेत. या पुढील निवणूक आम्ही केवळ विकास याच मुद्द्यावर लढवणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आम्ही राज्यातल्या जनतेला चांगले सरकार दिले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments