rashifal-2026

तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली, किंमत शंभरीपार

Webdunia
गुरूवार, 28 एप्रिल 2022 (11:29 IST)
नवी मुंबई- तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होत आहे यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. फरसबीसह वाटाण्याचे दर प्रतिकिलो शंभरच्या पुढे गेले आहेत तर टोमॅटो, कारलीचे दरही वाढले आहेत. गवारचे दर मात्र नियंत्रणात दिसत आहे. आधीच महागाईने कंबरडे मोडले आहे अशात भाजीपाल्याच्या दरात झालेली वाढ सामान्यांचा खिसा रिकामा करत आहे.  
 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी 592 ट्रक व टेम्पोमधून 2718 टन भाजीपाल्याची आवक झाली आहे तर जवळपास 5 लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये फरसबी चाळीस ते साठ रुपये किलो दराने विकले जात होते, त्याचे दर साठ ते शंभर रुपये झाले आहेत.
 
किरकोळ मार्केटमध्ये फरसबी 120 रुपये किलोवर गेली आहे. वाटाणाही किरकोळ मार्केटमध्ये शंभर रुपये किलो दराने विकला जात आहे. गवारचे दर घसरुन तीस ते साठ रुपयांवर आले आहेत. भेंडीचे दरही नियंत्रणात आहे. 
 
तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागल्याने दर वाढत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

१४ मुलांना जन्म देणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने त्यापैकी सहा मुलांना पैशांसाठी विकले

आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा युतीचा फॉर्म्युला तयार, नवी मुंबईवरील गतिरोध, या भागात मैत्रीपूर्ण लढती

गोवा क्लब घटनेनंतर फरार झालेल्या लुथरा बंधूंना थायलंडमध्ये अटक; २५ जणांच्या मृत्यूप्रकरणी भारतात प्रत्यार्पण करणार

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकत्वासाठी १ दशलक्ष 'गोल्ड कार्ड' व्हिसा जारी केले, जाणून घ्या त्याचे फायदे काय असतील

इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल वसुली 'बेकायदेशीर' आहे, सभापती राहुल नार्वेकर यांनी दिला ८ दिवसांचा अल्टिमेटम

पुढील लेख
Show comments