Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतातील पहिली घटना सोशल मिडीयाचा गैर वापर काही काळ पूर्ण जिल्हाभराचे इंटरनेट बंद

Webdunia
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016 (14:06 IST)
सोशल मिडिया इतका घातक ठरू शकतो याचे उधाहरण सध्या नाशिक आहे. सोशल मिडिया वरील अफवेमुळे तळेगाव येथील आंदोलन हिंस्र झाले. त्यात जवळपास कोटींचे नुकसान झाले असून हजारो लोकांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. तर येऊ घातलेला दसरा आणि मोहरम या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी प्रथमच देशात आणि महाराष्ट्रात मोबाईल आणि इतर इंटरनेट सेवा पोलिसांनी बंद करायला सांगितली असून ती बंद झाली आहे.
 
तळेगाव येथील आंदोलन सुरु असताना पोलिसांनी अनेकदा सागितले की सोशल मिडिया वापरू नका  परंतु कोणीही हे न ऐकता आक्षेपार्ह मजकुरासह आंदोलनाचे अनेक फोटो व्हिडियो ग्रुपवर टाकणे सुरुच होते. एकूणच परिस्थिती बघता संपर्काचे प्रभावी माध्यम समजल्या जाणारी इंटरनेटसेवा बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी कुठल्याची प्रकारे अफवा पसरवू नयेत किंवा अफवा पसरवून शांतता भंग करू नये असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले आहे. तसेच, संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा मोबाईल कंपन्यानी बंद ठेवून पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यामुळे आता नाशिक मधील लाखो लोकांचे नेट कमीत कमी तीन दिवस बंद राहणार आहे. 

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

पुढील लेख
Show comments