rashifal-2026

मराठा आरक्षण : शरद पवारांनी मराठा आरक्षणावर स्पष्ट भूमिका घ्यावी - प्रकाश आंबेडकर

Webdunia
शनिवार, 29 मे 2021 (20:35 IST)
संभाजीराजे छत्रपती यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, "आरक्षण हे अॅडमिनिस्ट्रेशन प्रिन्सिपल होत आहे, पण इथला राज्यकर्ते ते मानायला तयार नाही.येणाऱ्या सरकारला आरक्षण मुद्दा त्रासदायक होईल नव्हे काहीवेळा राज्यसत्ता चालवायला अडचण येईल
 
"राज्यकर्त्यांची इच्छा हवी होती रिव्ह्यू पिटीशन नाही तर राज्यपाल किंवा राष्ट्रपतींमार्फत करायला हवं. राज्यसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून पुनर्विचार याचिका करू शकतो. राज्यसत्तेशिवाय हे होणं अशक्य आहे."
 
ते पुढे म्हणाले, "शरद पवारांचं राजकारण 40 वर्षं बघतोय, ते नरो-वा कुंजरो वा असं करतात. पण, सगळ्याच विषयात असं करून चालत नाही. ते आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेत नाहीत आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात. आपण अपेक्षा करूया ते काहीतरी भूमिका घेतील."
 
"शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससाठी मी अस्पृश्य, पण संभाजीराजे यांच्याबरोबर जायला तयार म्हणूनच त्यांच्यासोबत इथं बसलोय," असंही ते पुढे म्हणाले.
या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, "गायकवाड समितीचा अहवाल त्रुटी भरून काढून लागाव्या लागतील, परिस्थिती प्रतिकूल, प्रयत्न करू. लवकरात लवकर दिल्लीत गोलमोज परिषद घेऊ. त्यासाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सगळे खासदार यांना बोलावणार."
 
उदयनराजे आणि मी वेगळा नाही, भेटायला काहीच अडचण नाही, असंही ते पुढे म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

Local body elections महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपंचायतींकरिता ४७ टक्के मतदान झाले; मतमोजणी २१ डिसेंबर रोजी

LIVE: मुंबईतील मतदार धार्मिक राजकारण नाकारतील काँग्रेसचा दावा

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल राजस्थानच्या १० दंत महाविद्यालयांना दंड, न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला

Flashback : २०२५ मध्ये रवीना टंडनची मुलगी राशापासून ते सैफचा मुलगा इब्राहिमपर्यंत, या स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला

केंद्र सरकारने महाराष्ट्रात ८९,७८० कोटी किमतीचे ३८ रेल्वे प्रकल्प मंजूर केले

पुढील लेख
Show comments