Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारची क्युरेटिव्ह याचिका दाखल करुन घेतली

Webdunia
शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 (23:15 IST)
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका दाखल करुन घेण्यास शनिवारी ( 14 ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे.
 
मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेण्यास होकार दर्शवला आहे.
 
शुक्रवारी (13 ऑक्टोबर) राज्य सरकारचे सर्वोच्च न्यायालयातले वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आणि सर्वोच्च न्यायालयाला त्यावर सुनावणी करण्याची विनंती केली.
 
यावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, “आम्ही ही याचिका दाखल करून त्यावर सुनावणी करण्यास तयार आहोत.”
 
मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झालं आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील खटल्याची सुनावणी झाल्यानंतर पाच सदस्यांनी आरक्षण रद्द करताना मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
 
याच निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी ही क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे.
 
राज्य सरकारनं 2018 मध्ये मराठा समाजाला एसईबीसी कायद्यांतर्गत आरक्षण दिलं होतं. पण मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ते रद्द केलं. त्यावेळी राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दिलेलं आरक्षण या निर्णयामुळे रद्द झालं.
 
मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध होऊ न शकल्यानं न्यायालयानं हे आरक्षण रद्द ठरवलं होतं.
 
मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेण्याचं मान्य केल्यानं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळालं आहे.
 
 








Published By- Priya Dixit
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

कोण आहे 14 मंदिरातील साईंच्या मूर्ती हटवणारा अजय शर्मा ?

अजित पवार यांनी पंचशक्ती उपक्रमाची घोषणा केली, लोकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केल्या जातील

माजी उपमुख्यमंत्री सरकारी बंगला रिकामा करणार

कर्नाटकच्या मंत्र्यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपने काँग्रेसवर सोडले टीकास्त्र

ठाण्यात क्रिप्टोकरन्सी स्कीममध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एक कोटींची फसवणूक, एकाच कुटुंबातील 19 जणांवर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments