Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही; भुजबळांची जरांगेवर घणाघाती टिका

Webdunia
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (21:16 IST)
Reservation is not a poverty alleviation program मराठा समाजाचा नविन नेता निर्माण झाला असून तो आम्ही त्यांच्या हक्काचे खातो असं म्हणतोय. अरे आम्ही तुझे खातो नसून दगडाला शेंदूर लावल्याने नविन देव निर्माण करण्यात आला आहे. असा घणाघाती आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच धनगर, तेली, माळी यांना नंतर ओबीसीमध्ये धुसवले असे म्हणणाऱ्यांनी आरक्षण म्हणजे काय हे आधी समजावून घेतले पाहीजे अशीही परखड टिका छगन भुजबळ यांनी केली आहे.
 
जालना येथे ओबीसी समाजाचा एल्गार सभा संपन्न होत आहे. या सभेला राज्यातील ओबीसी समाजाचे सर्वपक्षीय नेते हजर आहेत. या व्यासपीठावरून बोलताना महाराष्ट्राचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ म्हणाले, “मंडल आयोगाच्या अभ्यासानुसार देशात 54 टक्के ओबीसी असल्याने त्यांना 27 टक्के आरक्षणा द्यावेच लागेल असे सांगीतले होते. मंडल आयोगाना ही शिफारस देशभर फिरून अभ्यास करून सुचवला होता. केंद्रात ओबीसींना तत्कालीन व्ही. पी. सिंग यांनी तर महाराष्ट्रात शरद पवार यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून आरक्षण दिले होते.” असा खुलासा त्यांनी केला.
 
मनोज जरांगे पाटलांवर थेट आरोप करताना भुजबळ म्हणाले, “कोणाचं खाता ? असं सारखा प्रश्न विचारला जातो. आम्ही तुझे खात नाह. भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी आम्ही तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते आधी समजून घ्या! आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून तुम्हाला कोणता देव करायचा आहे ?” अशी घणाघाती टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हार्दिक पंड्या जगातील नंबर वन T20 अष्टपैलू खेळाडू बनला

Zika Virus: झिका व्हायरसबाबत अलर्ट, केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी ॲडव्हायझरी जारी केली

बुलढाण्यात अनियंत्रित कारची वृद्धाला धडक लागून दुर्देवी मृत्यू

अजित पवारांच्या बैठकीत नवाब मालिकांची उपस्थिती, भाजप आणि शिवसेनेचा आक्षेप

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक मुंबईतील कॉलेजमध्ये 'ड्रेस कोड' लागू करण्याच्या निर्णयावर नाराज

सर्व पहा

नवीन

विधानपरिषद निवडणुकीत नवाब मालिकांचे मत मोलाचे का?

ऑनलाईन बुक सेलर, 72 कोटी डॉलर्सचा तोटा ते जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी; ॲमेझॉनचा प्रवास

विश्वविजेता भारतीय संघ बार्बाडोसहून भारताकडे रवाना

अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालय 5 जुलै रोजी निकाल देणार, न्यायालयीन कोठडीत वाढ

'आमचा संघर्ष संपला नाही, आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये...', भाजपाला घेरत नाना पटोलेंचा मोठा दावा

पुढील लेख
Show comments